महाराष्ट्र

शहीद जवानाच्या पत्नीचे भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे, अधिकाऱ्यांच्या असहकार्याने सर्वसामान्य हैराण!

आकाश दडस, बिदाल: माण तालुक्यातील जाशी गावचे सुपुत्र चंद्रकांत गलांडे हे सात वर्षांपूर्वी भारतीय सेनेमध्ये सेवेत शहीद झाले आहेत. त्यांच्या पत्नी श्रीमती निशा गलांडे यांना राणंद येथे शासकीय जमीन मिळाली आहे. मात्र गट नंबर ११६१ या जमिनीची कब्जेपट्टी प्रमाणे विभक्त सातबारा करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून दहिवडी येथे भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारत असल्याची माहिती समोर आली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभारावर जनता नाराज आहे. याबाबतची अधिक माहिती अशी आहे की श्रीमती निशा चंद्रकांत गलांडे यांना सरकारी जमिन मिळाली आहे. सदर जमिनीचे कब्जेपट्टीप्रमाणे विभक्त सातबारा या कामासाठी भूमी अभिलेख कार्यालयात त्यांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

यावेळी वीरपत्नी निशा गलांडे म्हणाल्या, “शहीद पत्नीला प्रशासन व शासकीय अधिकारी अजिबात सहकार्य करत नाहीत. मुलांच्या शिक्षणाच्या कामानिमित्त मी पुण्यात राहते. दहिवडी येथे शासकीय तहसीलदार कार्यालय, प्रांत कार्यालय, अभिलेख कार्यालयात गेल्या दोन वर्षापासून हेलपाटे मारत आहे. मात्र प्रत्यक्ष न्याय अजूनही मिळत प्रशासनांकडून न्याय न मिळाल्यास सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.”

“दहिवडी येथे भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी व कर्मचारी सातत्याने गैरहजर असतात. कर्मचारी मला अजिबात सहकार्य करत नाहीत. या भागातील लोकप्रतिनिधी मला शासकीय कामात सहकार्य करत नाहीत.माजी सैनिक व भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय कामानिमित्त अनेकदा हेलपाटे मारून न्याय मिळत नाही,” त्या पुढे म्हणाल्या.

हे ही वाचा

एफडीए झाला ओसाड गावचा पाटील

मुख्यमंत्र्यांचे आदेश येताच जिल्हा प्रशासन जागे झाले; जिल्हाधिकाऱ्यांची मध्यरात्री आरोग्य केंद्रांना अचानक भेट

मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या गाड्यांसाठी विधानभवनात भेदभाव !

जाशी गावालगतच्या शेतात चंद्रकांत गलांडे यांची स्वतंत्र वस्ती असून तिथे चंद्रकांत यांचे वडील शंकर, आई सुलाबाई, पत्नी निशा, मुलगा श्रेयस आणि जय असे कुटुंब कायम राहते. चंद्रकांत हे २००४ मध्ये ते लष्करात भरती झाले होते. ते आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये देशसेवा करत होते. चंद्रकांत यांचे लग्न २१ नोव्हेंबर २०११ रोजी झाले. काश्मीर खोऱ्यात लान्स नायक चंद्रकांत गलांडे हे ३० सप्टेंबर २०१७ रोजी शहीद झाले आहेत.

सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणुन ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो तरुण भारतीय सैन्यात आपले कर्तव्य बजावत असून भारतीय सैन्यात दाखल होण्यासाठी जिल्ह्यातील हजारो तरुण सैन्य भरतीत सहभागी होत असतात. माण तालुक्यातील जाशी येथील तब्बल २० जवान देशाचे रक्षण करत आहेत. या छोट्याशा गावातून तब्बल वीस सुपुत्र देशसेवेत भरती झाले आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

18 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago