काही दिवसापूर्वी नाशिक जिल्हयात स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला होता तर शहरात देखील ३रुग्ण आढळले होते. त्याची टांगती तलवार असताना शहरात गोदावरीमुळे ज्या पानवेली वाढल्या आहेत त्यामुळे शहरात क्युलेक्स डासांचा (Culex mosquito) हैदोस वाढला आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातून मनपा मुख्यालयात तक्रारीचा पाऊस पडत असून पानवेली काढण्यासाठी आरोग्य विभागाने घनकचरा विभागाला साकडे घातले आहे. दोन महिन्यापूर्वी पत्र देऊनदेखील त्याची घनकचरा विभागाने दखल न घेतल्याने घनकचरा विभाग नागरिकांच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहे याबाबत शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.(Culex mosquito menace in Nashik)
महापालिका हद्दीमध्ये गोदावरी, वालदेवी आणि नंदीनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाढल्या आहेत. नदीपात्रात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी नदीपात्रामधे नागरिकांनी जुने कपडे सह विविध टाकाऊ वस्तू टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पानवेलीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. याचमुळे क्युलेक्सडासांची घनता वाढल्याने नदीकाठावरील नागरिक त्रस्त झाले आहेत . या पानवेली काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.त्यामुळे पानवेलीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. याचमुळे क्युलेक्सडासांची घनता वाढल्याने नदीकाठावरील नागरिक त्रस्त झाले आहेत . या पानवेली काढण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गाजल्या होत्या पानवेली
शहरातील सांडपाणी तसेच येथील औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याने गोदावरी नदीचे दिवसेदिवस प्रदूषण वाढत आहे. या प्रदूषणामुळे गोदावरीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहे. त्याचा परिणाम गोदावरी नदीकाठालगत असलेल्या नाशिक शहराला नव्हे तर पुढे निफाड तालुक्यातील चाटोरी, सायखेडा, चांदोरी, गोंडेगाव, शिंगवे, करंजगाव, चापडगाव, कोठुरे, मांजरगाव आदी गावातील नळपाणी पुरवठा योजनांवर देखील होत आहे. त्यामुळे शासनाने उल्हास नदी पॅटर्न राबवून गोदावरी नदीतील पानवेलीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी आमदार दिलीप बनकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली होती.
पानवेलीवर खर्च पाण्यात
पानवेली काढण्याच्या नावाने मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. त्यासाठी विविध यंत्रे खरेदी करण्यात आली. महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार गब्बर झाले मात्र पानवेलीचा प्रश्न कायम असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे .महापालिकेचे काही अधिकारी आणि ठेकेदार गब्बर झाले मात्र पानवेलीचा प्रश्न कायम असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे .
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…