शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप म्हणजे संस्थेची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि ती वाटचाल नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास आहे , असे विचार अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष प पू डॉ बाबासाहेब ( डॉ प्रदीप ) तराणेकर यांनी व्यक्त केले
कवी कालिदास संस्कृत विश्व विद्यालयाचे कुलगुरू डॉ हरेराम त्रिपाठी यांनी संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या
शुक्ल यजुर्वेदीय माध्यनदीन ब्राह्मण संस्थेच्या सुवर्ण महोत्सव समारोप प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे सुरवातीला दीपप्रज्वलन व भारतमाता , भगवान परशुराम , भगवान याज्ञवल्क्य यांचे प्रतिमांचे पूजन करण्यात आले.(Nashik Institute concludes golden jubilee year of Shuyama Brahmin Sanstha)
यावेळी पं रवींद्र देव , पं उपेंद्र देव , पं वैभव दीक्षित , वे शा स रवींद्रशास्त्री पैठणे गुरुजी , वे शा स गाडगीळ गुरुजी आणि महर्षी गौतमी गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठान पाठशाळेचे विध्यर्थी यांनी मंत्रघोष केला
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लावण्यात आलेल्या शिलालेखाचे अनावरण मान्यवरांनी केले , संस्थेच्या नोंदणी प्रमाण पत्राच्या प्रतिमेचे उत्साहात पूजन झाले
प्रमुख पाहुण्यांचा परिचय राजन कुलकर्णी वे मू रवींद्र पैठणे यांनी करून दिला , शाल स्मृतिचिन्ह , पुणेरी पगडी देऊन त्याचा सत्कार सतीश शुक्ल , तुषार जोशी ऍड भानुदास शौचे , चंद्रकांत महाजन यांनी केला , ऍड भानुदास शौचे यांनी प्रास्ताविक केले
सत्कार मूर्तींच्या यादीचे वाचन सुहास भणगे , सौ मोहिनी भगरे , सौ मंजुषा अगस्ते , प्रमोद मुळे यांनी केले , सत्कारमूर्तींना शाल आणि महर्षी याज्ञवल्क्य प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देण्यात आले , तुषार जोशी यांनी आभार मानले , सूत्रसंचालन सौ रोहिणी कुलकर्णी यांनी केले, पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला
सत्कारमूर्ती नावे
धर्मशास्त्र मिमांसक अशोक काका कुलकर्णी,वे.शा.सं.रविंद्रपैठणे,भागवताचार्य, नंदकुमार लासुरकर, डॉ.शिरिष देशपांडे,ज्योति.सचिन पाडेकर,मनपा नगररचना संचालक बावीस्कर साहेब, राजेंद्र डुबेरकर,सौ.शैलजा डुबेरकर, अमोल शौचे, वासंती कुलकर्णी, जयंत राव तेलंग, सुमंत पुराणिक,सौ.प्रिया मटंगे, विवेक मटंगे, चैतन्य घोटकर,प्रकाश अंधृटकर,पंकज धरणगावकर,अल्का कुलकर्णी, मनोज शेंद्रे,,सुदक्षिणा हेलवाडे, बाळकृष्ण वावीकर, सुनिल भणगे,वासंती जोशी , श्रीराम महाजन , ऍड मिलिंद चिंधडे , कुणाल देशपांडे
श्री सतीश शुक्ल, अनिल देशपांडे, उदयकुमार मुंगी, मालती कुरुंभट्टी, चंद्रशेखर गायधनी, मेधावती साताळकर, तुषार जोशी वैभव दीक्षित, प्रसाद महाजन भूषण जुन्नरे, रत्नप्रभा गर्गे, अभय अगस्ते, चंद्रकांत महाजन, महेंद्र गायधनी, चंद्रशेखर पंचाक्षरी दिलीप शुक्ल, धनंजय पुजारी, राजन कुलकर्णी, राजश्री शौचे, लक्ष्मीकांत भट, रवींद्र देव, उपेंद्र देव, गौरव अगस्ते, शशिकला शिंगणे, अशोक जोशी, कमलाकर कुलकर्णी, नीता गर्गे, प्रमोद मुळे, राजेंद्र बालटे, सुभाष भागवत, भूषण शुक्ल, अनिता कुलकर्णी, शांता जाधव, सुनिता परमार, गजानन जाधव
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…