उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या धार्मिक नगरिमध्ये येणाऱ्या राजपूत भाविकांसाठी राजपूत भवन अतिशय उपयुक्त – श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज

नाशिकच्या धार्मिक नगरीमध्ये राजपूत समाज बांधवांसाठी बांधण्यात येत असलेले राजपूत भवन हे राजपूत भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांनी केले.श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज, आमदार राहुल ढिकले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाफना वेअर हाऊस उपाध्ये कॉलेज परिसर नाशिक येथे राजपूत भवनाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे अध्यक्ष भगत सिंह राठौड़, उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत,अध्यक्ष अरविंद सिंह भाटी, किशोर सिंह कानोड़, भामाशाह राजस्थान राजपूत परिषदेचे मुख्य रघुनाथ सिंह सुराना, राजस्थान राजपूत परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सिंह राठौड़, जय नारायण विश्वविद्यालय जोधपुरचे पूर्व छात्र अध्यक्ष कुणाल सिंह भाटी, अध्यक्ष अरविंद सिंह भाटी, महाराणा एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी, राजेंद्र सिंह पांचाल यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज म्हणाले की, क्षत्रिय समाज फाऊंडेशन नाशिकसह परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यांचं हे कार्य समाजासाठी अतिशय महत्वाचे आहे. हे भवन उभारण्यासाठी पदाधिकारी अतिशय मेहनत घेत असून संस्थेचे या धार्मिक नगरीतील काम अतिशय कौतुकास्पद आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार राहुल ढिकले म्हणाले की, राजस्थान राजपूत समाजाच्या उपक्रमात आपला नेहमीच सहभाग असतो. संस्थेच्या वतीने नाशिक शहरात उभारण्यात येत असलेल्या या राजपूत भवनासाठी आपण आवश्यक ती मदत देऊ तसेच समाज बांधवांचे जे प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन काम करू असे क्षत्रिय समाज फाऊंडेशनचे संस्थापक तेजपाल सिंह सोढा यांनी सांगितले.

सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर काम करायला हवं असे महाराणा प्रताप एकता मंच मुंबईचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भाटी यांनी सांगितले.

नाशिकमध्ये राजस्थान राजपूत समाजाने केलेल्या कार्यातून राजस्थान मधील राजपूत समाजाला प्रेरणा मिळेल असे जय नारायण विश्वविद्यालयाचे अध्यक्ष अरविंद सिंह भाटी यांनी सांगितले.

राजपूत समाजाच्या कार्यासाठी आपण पुढे राहून काम करू असे माजी अध्यक्ष कुणाल सिंह भाटी यांनी सांगितले.

नाशिकच्या धार्मिक नगरीत आता राजपूत भवन निर्माण होत आहे या कार्यात आपले योगदान राहील असे राजस्थान राजपूत परिषद मुंबईचे अध्यक्ष महेंद्र सिंह यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.

यांनी घेतली प्रत्येकी एक रूम बांधण्याची घेतली जबाबदारी

या प्रसंगी कैप्टन किशोर सिंह राठौड़, क्षत्रिय समाज फाउंडेशनचे उपाध्यक्ष विनोद सिंह शेखावत, वरिष्ठ सल्लागार रंजीत सिंह चुंडावत, दयाल सिंह चौहान, तेजपाल सिंह शेखावत, गोविंद सिंह जादौन, राजस्थान राजपूत परिषद मुंबई यांच्या वतीने प्रत्येकी एक रूम बांधण्याची जबाबदारी घेण्यात आली. या प्रसंगी राजस्थान राजपूत परिषदेचे अध्यक्ष महेंद्र सिंह यांच्यासह सर्व दात्यांचा श्री श्री १००८ प्रताप पुरी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago