उत्तर महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दारणा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी कोरडेठाक पडले असून दारणा धरणातून दीड महिन्यातून आवर्तन दिले जात असल्याने दारणा काठची गावे विशेषत: भगूर, देवळाली कॅम्पसह नदीच्या काठावर असलेल्या गावांवर पाणीटंचाईचे सावट (water crisis) उभे ठाकले आहे. (Several villages in Nashik district face drinking water crisis)

दारणा धरणातील पाणी साठ्याची उपलब्धता बघता बघून नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुवर्णा दखणे यांनी नोटीस प्रसिद्ध करून भगूरकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्याचप्रमाणे शहराला कमी दाबाने व कमी वेळ पाणी पुरवठा करण्यात येईल. कुणीही पाण्याचा गैरवापर करू नये, पाणी इतरत्र वापरून वाया घालवू नये. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळाला तोट्या लावाव्यात.

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई लक्षात घेत पाण्याचा वापर काळजीपूर्वक, जपून करण्याचे आवाहन भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे तसेच देवळाली छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी केले आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार दिवसाआड किंवा आठवड्यातून काही दिवसच पाणीपुरवठा देवळाली कॅम्पला होण्याची शक्यता आहे.

पाणी जपून वापरावे, ज्यांनी नळांना मोटारी बसवले असतील त्यांनी त्या काढून घ्याव्यात, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे आवाहन केले आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांचे नाव तसेच पाटबंधारे विभागाचे रवींद्र सोनवणे यांनी दारणा नदी पात्राची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तसेच नदीपात्राच्या सद्य:स्थितीची पाहणी करून तसेच पाणी साठ्याची पाहणी करून त्याचा अहवाल तयार केला आहे

आगामी काळात पिण्याच्या पाण्याची होणारी टंचाई लक्षात घेत पाण्याचा वापर काळजीपूर्वक, जपून करण्याचे आवाहन भगूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखणे तसेच देवळाली छावणी परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी केले आहे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार दिवसाआड किंवा आठवड्यातून काही दिवसच पाणीपुरवठा देवळाली कॅम्पला होण्याची शक्यता आहे. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होऊन दारणा नदीपात्राची पाहणी करण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येवू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत देखील लवकरच निर्णय घेण्यात येवू शकतो.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

1 day ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago