गोस्वामी यांच्यावरील कथित हल्ल्याची ‘प्रेस कौन्सिल’ने स्वतःहून दखल घेत एक पत्रक जारी केले आहे.
‘पत्रकार म्हणून अर्णव गोस्वामी यांनी कथित मत मांडल्यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे समजले, अन् मनाला वेदना झाल्या. पत्रकारांसहित देशातील प्रत्येक नागरिकांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे. ही मते पचनी पडणारी नसली तरी गळा दाबून आवाज बंद करण्याचा अधिकार कोणालाही दिलेला नाही.’ अशी खंत कौन्सिलने व्यक्त केली आहे.
‘वाईट पत्रकारितेच्या विरोधातही हल्ला करणे हे उत्तर असू शकत नाही’ असे नमूद करीत कौन्सिलने गोस्वामी यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष कानपिचक्या दिल्या आहेत, व हल्ल्याचाही विरोध केला आहे.
‘प्रेस कौन्सिल या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहे. राज्य सरकारने हल्लेखोरांना पकडून लवकर न्याय मिळवून द्यावा’ असे नमूद करीत कौन्सिलने मुख्य सचिवांमार्फत राज्य सरकार व मुंबईच्या पोलीस आयुक्तांना ‘लवकर वस्तुस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या’ सुचना केल्या आहेत.
दरम्यान, ‘एडिटर्स गिल्ड’नेही एक पत्रक जारी करून गोस्वामी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
अर्णव गोस्वामींवरील एफआयआरसंबंधी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अर्णव गोस्वामी ( Arnab Goswami ) यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्ये केली, तसेच धार्मिक विद्वेष पसरविणारी वक्तव्येही केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात गोस्वामी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पाच राज्यांमध्ये असे एफआयआर दाखल झाले आहेत.
या एफआयआरला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी याचिका गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर आज सकाळी १० वाजता सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. मोहित शाह यांच्या खंडापीठासमोर ही सुनावणी होणार आहे.
हे सुद्धा वाचा
Arnab Goswami : भारतीय पत्रकारितेला चिटकलेला ‘कोरोना’
Arnab Goswami : अर्णव गोस्वामींमुळे मराठी उद्योजक व त्यांच्या आईने केली होती आत्महत्या
Rajdeep Sardesai slams Arnab Goswami over his resignation from Editors’ Guild
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…