धर्म जातीच्या लढाईत हक्काची लढाई मागे आमदार बच्चू कडू

मी सगळ्या समाजाला विनंती करतो कि माझ्यासहित नेत्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका
कारण आता निवडणूका आहेत त्यामुळे सगळीकडे धर्म आणि जातीची लढाई दिसत आहे आता एका ताट्यात जेवणारे लोक ताट हिसकाउ लागले आहेत मात्र यात हक्काची लढाई मागे राहिल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. ते नाशिकमध्ये रविवारी पत्रकारांशी बोलत होते.बच्चू कडू यांनी कापसाचे कांद्याचे भाव पडले त्यामुळे कापूस विकावा की नाही असे शेतकरी फोन करतात . त्यात बांगलादेश ने बंदी लावली म्हणून संत्रा पडून आहे याचा मी निषेध करतो.

छगन भुजबळ यांच्या राजीनामाबद्दल बोलताना मी या सगळ्या बाबतीत मी 20 तारखेला पत्रकार परिषद घेऊन बोलेल दोन समाजात वाद होईल असं कधी बच्चू कडू बोलणार नाही. शिवजयंती नंतर आम्हीही पत्रकार परिषद घेतोय अठरापगड जातींना घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केलं नवीन निर्णय घ्यायची आमची ताकद नाही समाज आम्हाला ताकद देईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ . मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटील यांनी गुलाल उधळला याबाबत देखील २० तारखेला पत्रकार परिषदेत बोलतो.

भाजप आमदारांच्या गोळीबाराबद्दल बोलताना बंदूक देशासाठी काढा स्वतःसाठी नाही .तेच शेतकऱ्यांसाठी कष्टकरांसाठी गोळी मारली असती तर आम्ही त्यांच स्वागत केले असते असे कडू म्हणाले. किरीट सोमय्या मीडियासमोर मांडत नाही तर ते कागदपत्र देखील घेऊन फिरतात. प्रहार बद्दल बोलताना शेतकऱ्यांच्या सोयीचं आम्ही राजकारण करू. भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा आहे. विधानसभेच्या वाटाघाटी झाल्या तरच लोकसभेला आम्ही भाजप सोबत राहू . नाहीतर आम्ही जळगाव अमरावती या ठिकाणी निवडणुका लढू. आम्ही लोकसभेचा दावा करत नाही विधानसभेचा दावा करतोय आता निश्चित झालं तरच आम्ही लोकसभेला काम करू . प्रहार हाच आमचा कोटा आम्हाला दुसऱ्याच्या कोट्यात जायची गरज नाही. आम्ही जानकर, राजू शेट्टी यांच्यासोबत मिटींग लावत आहोत कारण शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन शेट्टी , जानकर लढत असतील तर त्यांच्यासोबत बैठक घेणार आहोत असे आमदार कडू म्हणाले.

त्यांच्या मनात काय मी कसे सांगणार ?
प्रकाश आंबेडकर यांच्या मनात त्यांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकणार नाही . त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाच्या मनात काय सुरू आहे हे मला माहीत नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहे . माझ्यासारख्यांनी त्यांच्यावर बोलणं योग्य नाही असे आमदार बच्चू कडू म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago