काय डोंगार… काय झाडी… या डायलॉगमुळे राज्यात प्रसिध्दीस आलेले शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा तालुक्यात सततची दुष्काळी परिस्थिती त्यातच यंदा पावसाने दडी मारल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला. त्यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग आता चिंतेत आहे. बापूंनी आमदार झाल्यानंतर विकासकामांसाठी तालुक्यात तसा बक्कळ निधी नेला आहे. मात्र तालुक्याचा पाणीप्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे तालुक्यातील मतदार आता बापूंवर कमालीचा नाराज झाला आहे.
यंदा मोसमी पावसाने टांग दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहे. सांगोला तालुक्यात दुष्काळी चिन्हे दिसत असातना नीरा उजवा फाटा क्रमांक आठला मात्र अद्याप पाणी मिळालेले नाही. नियमाने ‘टेल टू हेड’ असे पाणी वाटप होणे अपेक्षित असताना देखील हे लाभक्षेत्र पाण्यापासून का वंचित आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत.
एकीकडे बापूंनी सांगोला उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा जोरदार प्रयत्न सुरु केला आहे. परंतू पावसाअभावी आता खरिप हंगाम वाया गेल्याची परिस्थिती तालुक्यात निर्मान झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या ती पिके आता करपून जाण्याच्या स्थितीत आहेत. निरा उजव्या कालव्याच्या फाट्याला पाणी सुटेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अद्याप या कालव्याला पाणी न सुटल्याने ‘बापू निधी नको आता पाणी द्या’ अशी मागणी शेतकरी करु लागले आहेत.
हे सुद्धा वाचा
ब्राझिलियन स्टार फुटबॉलर नेमार येणार भारतात
उज्ज्वला गलांडे-पाटील मिसेस इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स २०२३ मध्ये उपविजेत्या
ट्रॅव्हल्सला आग, महिलांची धावपळ; बाळासाहेब थोरातांच्या टीमने दुर्घटना टाळली
डोळ्यासमोर पिके करपून जात असताना पाहून चिंतातूर झालेला शेतकरी वर्ग आता आंदोलनाच्या तयारीत आहे. तालुक्यातील फाटा क्रमांक पाचवरील शेतकऱ्यांनी आंदोलन करुन पाणी मिळविले मात्र फाटा क्रमांक आठ वरील शेतकरी मात्र पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत, ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. आमदार शहाजीबापू आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी अनेकदा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले, दोन्ही लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षातील असताना देखील पाणीप्रश्न सुटत नसल्याने मतदार आता वैतागले आहेत.
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…
डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…
भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…