बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघाताबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात, अशा सूचना करतानाच एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. तसेच अपघात रोखण्याच्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे सुचवले होते. याची आठवण शरद पवार यांनी सरकारला करून दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना.असे ट्वीट करत मृतांना शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत, हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग..? असा प्रश्नही उपस्थित केला आहे. हा समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक अपघात झालेत. गेल्या वर्षभरात त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादेवर बंधन आणूनही अपघाताचे सत्र थांबता थांबत नाही. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे सामोरं आलेले आहे. यापुढे असे अपघात होऊ नये यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना करून योग्य ती पावले उचलावी..! असेही आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा:
बुलढाणा अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल; ट्विट करत व्यक्त केला शोक
समृध्दीवर अपघाताचे सत्र सुरूच; बुलढाण्याजवळ अपघातात 25 प्रवासी ठार
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…