टीम लय भारी
पुणे : जे लोक सारखे सारखे सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेले भांडे कधी आवाज करत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे.
इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या. हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे, असे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले.
आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेले नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही. करायचा तेवढा आवाज करा, सरकार पडलं तर बघू काय करायचं, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौ-यावरही भाष्य केले. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. “आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार, याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल?,” असे म्हणत सुप्रिया सुळेंनी महाआघाडी सरकारचे कौतुक केले. देशाचे प्रधानमंत्री वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपले पुणे हवेहवेसे वाटतेय, असा टोलाही त्यांनी लगावला.
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…