माण – खटावचा विकास ‘शिवराळ’ भाषेतून होणार नाही : वंचित बहुजन आघाडीने ठणकावले

लय भारी न्यूज नेटवर्क

बिदाल : माणमध्ये सत्ताधारी व विरोधक हे विकासाची फक्‍त टिमकी वाजवतात. त्यांनी विकासाचे गाजर दाखवून जनतेला झुलवत ठेवले आहे. पण जनता दुधखुळी नाही. शिवराळ भाषा वापरुन विकास होत नसतो. याचा बोध सत्ताधाऱ्यांनी घ्यावा, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे माण तालुका प्रभारी योगेश घोलप आमदार जयकुमार गोरे यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. वैद्यकीय क्षेत्रातील सज्जन व्यक्ती असलेल्या डॉ. प्रमोद गावडे यांनाच माण – खटावमधील जनतेने निवडून द्यावे असे आवाहनही घोलप यांनी केले. शेवरी गावामध्ये वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

माण – खटावचे मतदारसंघाचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. निवडणुकीच्या तोंडावर ते तीन महिन्यांपूर्वी भाजपमध्ये दाखल झाले आहेत. गोरे यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत राजकारणामध्ये गुंडगिरी, दादागिरी वाढली. सामान्य लोकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना दमदाटी करण्याचे प्रकार या काळात वाढले. त्या पार्श्वभूमीवर घोलप यांनी सडकून टीका केली

माण तालुक्‍यातील उत्तर भागातील शेतकरी पाण्यासाठी व्याकुळ आहेत. मग तुमच्या मताच्या आधारे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी काय करीत होते, असा प्रश्‍न त्यांना विचारण्याची आता वेळ आली आहे. लोकप्रतिनिधी लोकहिताच्या निर्णयापेक्षा पक्षाच्या नेत्याच्या हिताचा विचार करत आहे. कारण पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात बोलले तर पुढील काळात निवडणुकीत तिकीट मिळणार नाही, या भीतीमुळे लोकप्रतिनिधी आजपर्यंत गप्प राहिल्याने माण  तालुक्‍यातील उत्तर भाग दुष्काळाने वेढला आहे.

– डॉ. प्रमोद गावडे, उमेदवार, वंचित बहुजन आघाडी

[box type=”warning” align=”aligncenter” class=”” width=””]’नो पेड न्यूज’ : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आपल्या हिताच्या बातम्या छापून याव्यात म्हणून अनेक उमेदवार प्रसारमाध्यमांना लालूच दाखवतात. त्या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’ या न्यूज पोर्टलने ‘नो पेड न्यूज’ ही सुस्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ‘लय भारी’ पोर्टलसाठी कुणीही लालूच दाखविण्याचा प्रयत्न करू नये. वस्तुनिष्ठ, सत्य व भारतीय राज्य घटनेच्या तत्वांना अनुसरूनच आम्ही पत्रकारिता करतो, हे अभिमानाने नमूद करीत आहोत. – संपादक[/box]

शेवरी गावात योगेश घोलप बोलताना म्हणाले की, माण – खटाव मतदारसंघात रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत गरजांवर पाच वर्षात काम झालेले नाही. तालुक्‍यातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पाच वर्षात एकही नवा रस्ता झालेला नाही. फक्त घोषणाबाजी झाली आहे. विजेचाही लपंडाव सुरुच असून, वीज रोहित्र जळाल्यानंतर ते अठ्ठेचाळीस तासात मिळणे बंधनकारक आहे. मात्र, पैसे देऊन ते आठ दिवसांनी सुद्धा मिळत नाही.

तुषार खरात

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

3 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

3 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

4 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

7 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

8 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

8 hours ago