टीम लय भारी
मुंबई :- एकीकडे वाहनांच्या किंमती, इंधनाच्या किंमती वाढत होत असताना आता राष्ट्रीय हायवेवरून प्रवासदेखील महागणार आहे. १ एप्रिलपासून टोलच्या दरांत ५ टक्के वाढ केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने टोलच्या दरात ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मासिक पासच्या दरातही वाढ केली जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी टोलच्या दरात वाढ करते. याच संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. येत्या वर्षभरात सर्व टोलनाके (Toll plaza) हटवण्यात येतील. टोलच्या जागी जीपीएस (GPS) यंत्रणा बसवण्यात येईल, असे नितीन गडकरी म्हणाले.
सर्व टोलनाके रद्द करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. लोक रस्तेप्रवास जेव्हढा करतील, तेव्हढाच त्यांना टोल द्यावा लागेल, अशा पद्धतीचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम सुरु असल्याचे गडकरींनी नमूद केले आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी महापालिकेच्या टोलचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. त्यावर गडकरींनी उत्तर दिले. गडकरींनी मागील सरकारकडे बोट दाखवत, टोलनाक्यांद्वारे मलई खाण्यासाठी असे छोटे-छोटे टोल उभारण्यात आल्याचे म्हटले. शहरांच्या सीमांवर असे टोल असणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हढा रस्ता वापराल, तेव्हढाच टोल
नितीन गडकरी म्हणाले, “जर आम्ही टोलनाके बंद केले तर रस्ते बनवणाऱ्या कंपन्या आमच्याकडे भरपाई मागतील. परंतु सरकारने पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्याची योजना केली आहे.” टोल हटवणे म्हणजे टोलनाके हटवणे असा अर्थ आहे. सध्या सरकार अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, जिथे तुम्ही हायवेवर प्रवेश करताच, जीपीएसच्या मदतीने तुमचा फोटो काढला जाईल. जिथून तुम्ही हायवे सोडाल, तिथेही फोटो घेतला जाईल. म्हणजे तुम्ही जेव्हढा हायवेचा प्रवास केला किंवा जेव्हढा रस्ता वापरला तेव्हढाच टोल तुम्हाला द्यावा लागेल, असे गडकरी म्हणाले.
टोलनाकामुक्त देश… काय आहे GPS प्रणाली?
कसे चालते जीपीएस (GPS) सिस्टमचे काम?
यापूर्वी नितीन गडकरी काय म्हणाले होते?
जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…
जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…
आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…