राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर प्रसार माध्यमात येत असलेले शिल्पा शेट्टीचे नाव यामुळे आपली बदनामी होते, असा दावा शिल्पा शेट्टीने न्यायालयात केला होता. यावरुन बराच वेळ न्यायालयात युक्तीवाद देखील झाला. मात्र, तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडते, म्हणून लिहिले जाते. तसेच तुमच्याशी संबंधीत काही घडते आणि त्याबद्दल जर लिहिले गेले असेल तर त्यांवर तुम्ही बंधने आणण्याची मागणी कशी काय करू शकता? असा उलट प्रश्नच न्यायालयाने शिल्पा शेट्टीला विचारला.
शिल्पा शेट्टी यांचा प्रसारमाध्यमांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा
भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू क्वार्टर फायनलमध्ये धडकणार
आता तुमच्या बद्दल काही चांगले लिहीयाचे की काहीच लिहू नका, हे आम्हा कसे सांगू शकतो, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले. तसेच, या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली (Shilpa Shetty directed to file reply by August 26).
कोणी एका प्रसार माध्यामाने दाखवेल्या बातमीचा आधार घेवून तुम्ही सरसकट सर्वांवर बंधने आणण्याची मागणी करत आहात, हे धक्कादायक आहे असा सरसकट निर्देश देता येत नाही. आपला लोकशाही देश आहे इथे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. प्रसार माध्यमांना देखील पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण पत्रकारीता ही विश्वासहार्य आणि जबाबदारीने केली पाहिजे हे ही तितकेच खरे आहे त्यामुळे न्यायालय असे निर्देश देवू शकत नाही, असे सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केले (Justice Gautam Patel clarified that the court could not issue such directions).
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1,800 कोटींचे नुकसान
यावर आम्ही कोणावर बंदी घालण्याची मागणी करत नाही. मात्र, वार्तांकन करताना वैयक्तिक पातळीवर टिका टिप्पणी नसावी असा युक्तीवाद शिल्पा शेट्टीने केला आहे (Shilpa Shetty say that there should be no criticism on a personal level).
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…