टीम लय भारी
मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पत्रकार परिषद घेतं मोदी सरकारवर जोरादार टीका केली आहे.उपाशीपोटीच क्रांती घडते एवढं लक्षात घ्या त्यामुळे महागाई आवरती घ्या महागाईवर काहीतरी बोला अन्यथा पुढचा काळ कठीण आहे.
मागच्या मार्चमध्ये महागाईचा दर ७.२ होता आता महागाईचा दर १४ वर पोचला आहे याचा अर्थ महागाई कधी नव्हे एवढी ७० वर्षात शिगेला पोचली आहे. ७० वर्षात कॉंग्रेसने म्हणजे आम्ही काय केले बोलणार्यांना आम्ही महागाई जागतिक बाजारात होती तेव्हा रोखून धरली होती आता जागतिक बाजारात महागाई नाहीय. पण आपल्या देशात आहे याची आठवणही जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी करुन दिली आहे.
देशातील पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव कुठे पोचले आहेत हे एखाद्या गृहिणीला विचारा, गाडी वापरणाऱ्या मध्यमवर्गीयाला विचारा म्हणजे समजेलं. एकंदरीतच महागाई सर्वसामान्यांना भाजून काढत आहे. उन्हाचा चटका कमी तर महागाईचा चटका जास्त बसतोय मात्र आपण फक्त मिडिया, पेपरमध्ये, राजकीय चर्चेतसुध्दा काय पहातो आहे तर फक्त नको त्या विषयांना विषय बनवले जात आहे.
एकंदरीतच महागाई कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हे केले जात आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हटलं आहे. धर्म ही अफूची गोळी आहे ती खाल्ली की लोकं सगळं विसरतात हे कार्ल मार्क्स यांचे उदाहरणही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिले आहे.
हे सुध्दा वाचा:
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही – जितेंद्र आव्हाड
ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी भाजपच्या विरोधात बंड पुकारल्याने आता माढा मतदारसंघातील समीकरणे बदलली…
सनी गंगाघाटावरून जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला होता. त्यानंतर त्यांची भेट पून्हा…
येवला शहरात छगन भुजबळांच्या निकट वरती (Chhagan Bhujbal's personal assistant) यांना एका महाठकाने 50 हजाराला…
उध्दव सेनेने उमेदवारी देण्याचा वर्षभरापूर्वीच शब्द दिला आणि ऐनवेळा शब्द फिरवला असा आराेप करीत अखेरीस…
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (University) संलग्नित महाविद्यालयातील पदवीपूर्व अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या तृतीय शैक्षणिक वर्षात असलेल्या…
शहरात वाहनतळांची पुरेशी व्यवस्था नसताना तसेच रस्त्यांलगत अतिक्रमण कायम आहे. या समस्या जैसे थे असताना…