मुंबई

अंधेरी ते बोरिवली 20 मिनिटांत तेही अवघ्या 40 रुपयांत!

मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुककोडींमुळे ऐरवी वैतागलेल्या मुंबईकरांना मुंबई मेट्रोमुळे (Mumbai Metro) अंधेरी ते बोरिवली रस्तेमार्गावरुन होणार दीड तासांचा प्रवास २० मिनिटांवर आणि २५० रुपये प्रवास खर्च अवघ्या २० रुपयांवर आल्यामुळे आनंदाला पारावार राहिलेला नाही. मुंबईतील एका महिला प्रवाशाने नुकत्याच लोकार्पण झालेल्या मुंबई मेट्रो प्रवासाचा अनुभव ट्विटरवर सांगत मंबईकरांसाठी मेट्रो वरदान असल्याचे म्हटले आहे. (Mumbai Metro is preferred by commuters, saving time and money too)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच मुंबई मेट्रो ७ आणि मेट्रो २ ‘अ’चे लोकार्पण केले होते. त्यानंतर आता मुंबईकर मेट्रो प्रवासाला पसंती देत असून मेट्रोची प्रवासी संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या शुक्रवार अखेर दोन्ही मार्गांवरील प्रवासी संख्या जवळपास ५० ते ६० हजारांहून अधिक झाली आहे. मेट्रोमुळे प्रवाशांना सुखद प्रवासाचा अनुभव येत असून दररोजच्या वाहतूककोंडीच्या कटकटीतून त्यांची सुटका झाली आहे. तसेच प्रवाशांचे पैसे देखील वाचत आहेत. त्यामुळे मुंबईकरांची मेट्रोला दिवसेंदिवस पसंती वाढत असल्याचे दिसत आहे.

एका महिला प्रवाशाने आपला मेट्रोप्रवासाचा अनुभव ट्विटरवर शेअर करताना म्हटले आहे की, ”आज बोरिवलीला जाण्यासाठी मेट्रोतून प्रवास केला. साधारण अंधेरी ते बोरिवली प्रवासाला दिड तास लागतो आणि त्यासाठी अॅटो रिक्षासाठी २५० रुपये मोजावे लागतात. मात्र मेट्रोतून हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत झाला आणि तो देखील अवघ्या ४० रुपयांत. मुंबईकरांसाठी हे किती मोठं वरदान आहे.”

मुंबई मेट्रोचा हा अनुभव शेअर करताना या प्रवाशाने मुंबईकरांसाठी मेट्रो हे वरदान असल्याचे म्हटले असून, मेट्रोमुळे मुंबईकरांची किती मोठी सोय झाली आहे हे या ट्विटमधून जाणवते. येत्या काही काळात मुंबईत मेट्रोचे जाळे आणखी वाढणार असून प्रवासात होणारी गैरसोय देखील कमी होणार आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो २ ‘अ’ या मार्गांना अल्पावधीत प्रवाशांची पसंती मिळत आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या मधून जातात त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या येत्या काही काळात कमी होऊन या मार्गांवरील वाहतूककोंडी कमी होण्यास देखील मदत होणार आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

37 mins ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

2 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

3 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

17 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

19 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

19 hours ago