मुंबई

टोलनाक्यांच्या सुविधांवरून राज ठाकरे आक्रमक

राज्यातील टोलनाक्यांवरून राज ठाकरे यांनी गुरुवारी, (12 ऑक्टोबर) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर, आज शुक्रवारी (13 ऑक्टोबर) पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत टोलच्या मुद्द्यावरून सुमारे 2 तास चर्चा करण्यात आली. काल मुख्यमंत्ऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतून विशेष तोडगा न निघाल्याने आज पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. आज झालेल्या बैठकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दादा भुसे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. या बैठकीतून टोलसंदर्भात महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले, “9 वर्षानंतर ठाण्यातून टोलचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. टोलच्या मुद्यासाठी काल सह्याद्रीवर गेलो होतो. राज्यात कोणत्याच टोलवर चारचाकींना टोल आकारात नसल्याच फडणविसांनी सांगितले होते. त्यांच्या व्यक्तव्यानंतर राज्यात चलबिचल सुरू झाली.”

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे

  • पुढील 15 दिवसांत मुंबईच्या सर्व एंट्री पॉईंटवर राज्य सरकार तसेच मनसेतर्फे कॅमेरे लावण्यात येणार
  • या कॅमेऱ्यावर मंत्रालयातून वॉच ठेवला जाणार
  • टोलनाक्यांच्या एंट्री पॉइंटवर गाड्यांची मोजणी करण्यात येईल.
  • नागरिकांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईन नंबर देण्यात येणार
  • मनसेतर्फे राज्यातील सर्व टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची उभारणी
  • मंत्रालयात टोलसंदर्भात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार
  • करारातील सर्व उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे आयआयटीकडून ऑडिट करण्यात येईल
  • यलो लाईनच्या 200 मीटर अंतरावरील सर्व वाहने विनाटोल सोडली जाणार.
  • 4 मिनिटांच्या पुढे एकही गाडी टोलनाक्यावर थांबणार नाही
  • टोलनाक्यावर आता पोलीस तैनात केले जातील
  • डिजिटल बोर्ड लावून टोलवसुलीची माहिती दिली जाईल
  • ठाण्यातील आनंदनगर किंवा ऐरोली टोलनाक्यावर एकदाच टोल भरला जाईल
  • फास्ट टॅग चालला नाही तरी टोल भरावा लागणार नाही
  • चारचाकी वाहनांवरील टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला 1 महिन्याचा अवधी
  • पीडब्ल्यूडीचे 29 तर MSRDC चे 15 टोलनाके बंद करण्याबाबत 15 दिवसांत निर्णय
  • टोलनाक्याजवळ राहणाऱ्या रहिवाशांना सवलत पास
  • राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते खराब असतील तर टोल रद्द करू शकतो.
  • अवजड वाहनांना महिनाभरात शिस्त लावणार

राज्यातील टोल नाके आणि त्यासंबंधातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काल सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, आमदार राजू पाटील, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलिस गृहनिर्माण मंडळाच्या अर्चना त्यागी, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अमित ठाकरे, यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी राज्यातील टोल प्रश्न, टोल नाक्यांची कंत्राटे यासोबतच मुंबई पोलिसांच्या घराबाबतच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी, पोलिसांना 15,000 घरे देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली.

लय भारी

Recent Posts

आमचं सरकार आलं तर जरांगेंची मराठा आरक्षणची मागणी प्रथम पूर्ण करणार, जयंत पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरकार त्यावर विचार करणार का?…

3 days ago

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची स्ट्रॅटेजी तयार; देवेंद्र फडणवीस

राज्यात भाजपच्या आलेल्या कमी जागा ४८ पैकी ४५ हून अधिकचचा नारा देऊनही केवळ ९ जागांवर…

3 days ago

कामगारांच्या आराेग्यासाठी इएसआयसीला महिन्याला १३ काेटी देऊनही कामगारांचे आराेग्य मात्र अधांतरीच

कामगारांच्या आराेग्यासाठी (workers health) उद्योजकवर्गाकडून इएसआयसीला महिन्याला १३ काेटी अर्थातच वर्षाला १५६ काेटी रूपये देऊनही…

3 days ago

रात्री एक वाजेपर्यत मित्रांसोबत पार्टी करणं महिला डॉक्टरच्या जीवावर बेतलं

मेडिकल कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिला डॉक्टरचा मृत्यू (doctor's life) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली…

3 days ago

सातपूर आयटीआयच्या माजी प्राचार्यांचा कारनामा, बनावट बिले सादर करत केला लाखोंचा घोटाळा

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालीन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन लाखोंचा घोटाळा (duped)…

3 days ago

नाशिक येथे स्टॉक, आयपीओ घेण्यास भाग पाडत तरुणांना लाखोंचा गंडा

विविध कंपन्यांचे स्टॉक व आयपीओ घेण्यास भाग पाडून वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा करण्यास लावून अज्ञात…

3 days ago