Categories: राजकीय

मोठी बातमी : शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा, शिवसेनेची एनडीएसोबत काडीमोड

लय भारी न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेचे भाजपसोबत पुरते बिनसले आहे. आता शिवसेनेने भाजपप्रणील ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’सोबतचेही (एनडीए) संबंध संपुष्टात आणले आहेत. शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी आपण मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी ट्विटद्वारे राजीनाम्याची घोषणा केली आहे.

शिवसेनेने एनडीए सोबतचे सगळे संबंध तोडले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ शकतो, अशी अट राष्ट्रवादी काँग्रेसने काल जाहीर केली होती. त्यानंतर सावंत यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. एनडीएमधून शिवसेना बाहेर पडल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याचा मार्ग शिवसेनेसाठी खुला झाला असल्याचे बोलले जात आहे.

सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे ?, आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी ११.०० वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद (Press Conference) घेणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.’ अशा शब्दांत सावंत यांनी भाजपवर दुगाण्या झाडल्या आहेत.

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज खासदार संजय राऊत भेटणार आहेत. या भेटीअगोदरच सावंत यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा करण्याचा मार्ग अधिक प्रशस्त होणार आहे. शिवसेनेने भाजपबरोबर काडीमोड घेतल्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेला राज्यात पाठिंबा देण्यासाठी तयार होतील, असे बोलले जात आहे.

सोनिया गांधी व शरद पवार यांचा होकार मिळवून आज शिवसेनेचे नेते सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना भेटतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

तुषार खरात

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

3 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

4 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

5 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

6 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

6 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

6 hours ago