राजकीय

बाळासाहेब थोरातांनी ठणकावले : मोदी सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात काँग्रेस संघर्ष करणार

टीम लय भारी

मुंबई : शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करणारे कायदे नरेंद्र मोदी सरकारने आणले आहेत. हे कायदे मागे घेण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, अशी संतप्त भावना राज्याचे महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे ( Balasaheb Thorat said, Congress will strongly oppose to Farmers bills ).

ते पुढे म्हणाले की, भाजपच्या मोदी सरकारने लोकसभा व राज्य सभेत हे कायदे मंजूर करून घेतले. शेतकरी कायद्यांवर सभागृहामध्ये चर्चा व्हायला हवी अशी सर्वपक्षीय खासदारांची मागणी होती. परंतु ही मागणी मान्य केली नाही. उलट ८ खासदारांना निलंबित करण्यात आले ( Balasaheb Thorat said, BJP suspended to 8 MPs ).

भाजपने केलेले हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपविणारे हे कायदे आहेत. बाजार समित्यांसारख्या संस्था शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्थापन केलेल्या आहेत. अशा संस्थांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे. परंतु या संस्था आता मोडीत निघणार आहेत ( Balasaheb Thorat attacks on BJP ).

हे सुद्धा वाचा

नरेंद्र मोदींनी डावललेले माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन

Corona : कोरोनाला रोखण्यासाठी लागणार ५ वर्षांचा कालावधी!

Anil Ambani : अनिल अंबानी यांनी पत्नीचे सर्व दागिने विकले; तर घरखर्चासाठी घेतले मुलाकडून कर्ज

देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत संजय राऊत यांनी दिले स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीमुळे मोठा दिलासा मिळायचा. परंतु येथून पुढे हे संपणार आहे. त्यामुळेच देशभरातील शेतकरी विरोध करीत आहेत. शेतकऱ्यांचा हा विरोध व आक्रोश चिंताजनक आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या ठाम मागे उभे राहणार आहोत ( SpeakUpForFarmers ).

हा कायदा मोदी सरकारने मागे घेतला पाहीजे. कृषी उत्पन्न समित्यांचे बळकटीकरण झाले पाहीजे. आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळाली पाहीजे. यासाठी काँग्रेसने जनआंदोलन उभे केले आहे.

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभी आहे. कायदे रद्द करण्यासाठी काँग्रेस संघर्ष करेल, असेही थोरात म्हणाले.

येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

तुषार खरात

Recent Posts

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी प्या हर्बल ड्रिंक

अनावश्यक वजन वाढणे आणि हार्मोनल चढउतार ही थायरॉईड वाढण्याची लक्षणे आहेत. थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची…

43 mins ago

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

21 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

22 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

22 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

23 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

1 day ago