लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या हितासाठी शिवसेनेने काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. दोन्ही पक्षांमधील नेत्यांना राज्यचालवण्याचा अनुभव आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल. महाराष्ट्राच्या हितासाठी एकसूत्री कार्यक्रम राबवणार आहोत. असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’वरून राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. 5 वर्ष नाही तर 25 शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छाही राऊत यांनी व्यक्त केली. विविध विषयांवर भूमिका व्यक्त केली. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे. लाख प्रयत्न करा, कुणीही शिवसेनेला रोखू शकणार नाही,’ असेही खासदार राऊत यांनी सांगितले.
भाजपला वगळून राज्यात सत्तास्थापनेच्या सुरू असलेल्या हालचालींवर त्यांनी भाष्य केलं. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम रूप दिलं जाणार आहे. नवं सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याच्या हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल,’ असं राऊत म्हणाले.
विनयभंग, गंभीर दुखापत व खुनाचा गुन्हा व खुनाचे तीन प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असूनही वारंवार…
एका शेअरवर अनेक बोनस मिळतील, आमच्या कंपनीचे स्टॉक (stock market) आयपीओ घेतले तर निव्वळ नफाच…
गोदावरी नदीपात्रात अहिल्यादेवी होळकर पूलाखाली स्मार्टसिटी कंपनीकडून मॅकेनिकल गेट बसविताना काँक्रिटीकरणाचा बेस तयार केला जात…
देशात लोकसभा निवडणूक पार पडली असून ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र,…
कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा एका कैद्याचा खून (killed) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन गटातील मारहाणीत…
येथील प्रभू श्रीराम चौकात (तीनपाटी) कांदा व्यापाराच्या हातातून सहा लाख रुपये रोकड असलेली पिशवी घेऊन…