लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत राज्यपालांसोबत आम्ही चर्चा केली आहे. सरकार स्थापन करण्यास उशीर होत आहे. त्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदींबाबत राज्यपालांसोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार आता आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना दिली.
चंद्रकांत पाटील यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. चंद्रकांत पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रासप, रयत, शिवसंग्राम ही महायुती झाली होती. या महायुतीला स्पष्ट जनादेश मिळालेला आहे. महायुतीचे सरकार स्थापन व्हावे अशी लोकांची इच्छा आहे. पण काही कारणास्तव उशीर होत आहे. त्या अनुषंगाने आम्ही राज्यपालांकडे कायदेशीर मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानुसार आता आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत.
पुढील कोणता निर्णय घेणार याची माहिती मात्र चंद्रकांत पाटील यांनी दिली नाही.
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…