‘लय भारी’शी बोलताना ते ( Gopichand Padalkar ) म्हणाले की, ‘लॉकडाऊन’मुळे राज्यभरातील गरीब जनतेचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत. अगोदरच बेताची परिस्थिती असलेल्या या सामान्य लोकांची ‘लॉकडाऊन’मुळे उपासमार होत आहे.
सामान्य लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा सरकारने लक्षात घ्यायला हव्यात. राज्यभरातील तालुका, जिल्हा स्तरापासून ते मुंबई – पुण्यासारख्या महागनगरांतील अनेक सरकारी कार्यालयांनी बँकांमध्ये ठेवी ठेवलेल्या आहेत. लोकांच्या मृत्यूची वाट पाहण्यापेक्षा या ठेवी मोडून त्या लोकांसाठी खर्च कराव्यात.
मुंबई महापालिकेच्या जशा 63 लाख रुपयांच्या ठेवी आहेत, तशा ठेवी सरकारच्या विविध खात्यांच्या आहेत. यांत एमएमआरडीएसारखी प्राधिकरणे व कार्यालयांचा त्यात समावेश असल्याचे ते म्हणाले.
ठेवींच्या माध्यमातून अडचणीच्या काळात सरकारकडे मोठा निधी प्राप्त होणार आहे. त्याचा निनियोग गोरगरीब लोकांसाठीच व्हायला हवा. हे सामान्य लोक कपडे, मीठ, तेल खरेदी करतात. त्यातून सरकारला कर मिळतो. हीच सामान्य जनता आता संकटात सापडली आहे.
या सामान्य जनतेला घर चालविण्यासाठी रोख रक्कम द्या, किंवा जीवनावश्यक वस्तुंचा पुरेसा पुरवठा करा, अशी मागणी गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा
IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून ‘कोरोना’च्या लढाईत आघाडी
BREAKING : ‘कोरोना’ग्रस्त मंत्र्यांना मुंबईत हलविण्याची शक्यता, सचिव सुद्धा झाले ‘कॉरन्टाईन’
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…
आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…
'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…