राजकीय

…10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली; जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी रविवारी (दि.16) रोजी आणि मंत्र्यांसह आमदारांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. अशातच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक सुचक ट्विट करत राजकारणात संयमाला किती महत्त्व असते हे शरद पवारांकडून शिकावे असे म्हणत कोणाची विकेट कधी गेली हे विकेट गेलेल्या माणसाला कळत नाही. १५ दिवसानंतर त्याची जाणिव होते असे म्हणत आव्हाडांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी येवल्यात सभा घेऊन यापुढे देखील आपण रायकीय लढ्यासाठी शड्डू ठोकून आहोत असाच संदेश दिला. खरेतर अजित पवार गटातील आमदारांचा शपथविधी, सरकारमध्ये खातेवाटप झाले तरी त्यांच्या गटाकडे नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट झालेले नाही. अशातच रविवारी (दि16) रोजी अजित पवारांसह त्यांच्या गटाचे मंत्री आणि आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदारांनी शदर पवार यांची भेट घेतली.

शरद पवार यांनी पक्ष एकसंध रहावा यासाठी मार्ग काढावा असे अजित पवार गटाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे शरद पवार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवार यांच्या भेटीमुळे अजित पवार गटामध्ये धाकधूक असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाच्या आमदारांनी अजित पवार आणि प्रफुल पटेल यांच्यावर संताप व्यक्त केल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहे. दुसरीकडे शरद पवार यांनी देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहत अजित पवार गटाला सपशेलपणे दुर्लक्षित केले आहे. काही दिवसांपूर्वी पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा करणारे, शरद पवार यांनी निवृत्त व्हावे अशी भूमिका मांडणाऱ्या अजित पवार गटाला आता शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद हवे आहेत. पक्ष एकसंध रहावा यासाठी शरद पवार यांनी मार्ग काढावा अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान याच उलथापालथी दरम्यान राष्ट्रवादी पवार गटाचे पक्ष प्रतोद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. ”पुरोगामी महाराष्ट्राचा एकमेव आवाज… शिव, फुले, शाहू, आंबेडकरांचा खरा प्रतिनिधी आणि राजकारणात संयमाला किती महत्व आहे हे कोणाकडून शिकावं; एकच नाव शरद पवार ! कोणाची विकेट कशी गेली हे विकेट गेलेल्या माणसालाही कळत नाही. 10-15 दिवसांनी जाणीव होते आपली विकेट गेली.” असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा 
भूमाफियांनी शेकडो हेक्टर कांदळवन तो़डल्यावर ठाणे जिल्हा प्रशासनाला जाग; कांदळवनासाठी टोल फ्री क्रमांक
प्रणिता थोरातला उच्च शिक्षणासाठी जर्मन सरकारची फेलोशिप; जातीयता व लिंगभेदावर करणार संशोधन
विधान सभेत शरद पवार गटातील फक्त 8 आमदार दिसले, व्हीप नेमका कुणाचा मानायचा? आमदारांना प्रश्न

त्यामुळे शरद पवार यांचे राजकाण कळणे कोणाला वाटते तितके सोपे नाही असेच आव्हाड यांनी म्हटल्याचे दिसते. पवार हे पुरोगामी महाराष्ट्राचा आवाज आहेत. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आहे.

 

 

प्रदीप माळी

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

7 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

8 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

11 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

11 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

12 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

12 hours ago