टीम लय भारी
मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेतील शिंदे गट आणि भाजपने आपले बहुमत सिद्ध केले आहे. १६४ जणांनी शिंदे-भाजप सरकारला आपले मत दिले. तर महाविकास आघाडी तीन आकडी संख्या देखील या बहुमत चाचणीमध्ये पार करू शकली नाही. महाविकास आघाडी सरकारला फक्त ९९ मते मिळविण्यात यश मिळाले.
बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या दिवशी काँग्रेसचे तब्बल पाच आमदार अनुपस्थित होते. काल पर्यंत शिवसेनेसोबत असलेले संतोष बांगर यांनी देखील यावेळी शिवसेनेच्या शिंदे गटात आपले मत टाकले. त्यामुळे शिवसेनेला बहुमत चाचणीवेळी आणखी एक धक्का सहन करावा लागला.
दरम्यान, यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांना विधानभवनात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने त्यांची ऐनवेळी धावपळ पण पाहायला मिळाली. पण तरी देखील काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांना बहुमत चाचणीला मुकायला लागले.
हे सुद्धा वाचा :
नवं युती सरकार पडणार की पाडणार? राज्यात भविष्यवाण्यांना आला ऊत
मनसेच्या संदीप देशपांडेंनी ठाकरे बाप-लेकाला डिवचले
‘तुमची लायकी आता फक्त बटण दाबण्यापूर्ती’, निलेश राणे यांचा शिवसेनेवर घणाघात
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…
जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…
जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…