लय भारी न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजू शेट्टी यांना सोडून सदाभाऊ खोत यांच्यासोबत गेलेले रविकांत तुपकर स्वगृही पुनरागमन करीत आहेत. अवघ्या पंधरा दिवसांतच तुपकर यांनी सदाभाऊ खोत यांची साथ सोडली आहे. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत ते पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये येत आहेत.
भाजपने तुपकर यांना काही आश्वासने दिली होती. भाजपच्या सांगण्यावरूनच तुपकर सदाभाऊ खोतकर यांच्या रयतमध्ये दाखल झाले होते. पण हा निर्णय तुपकर यांना स्वतःच्याच मनाला पटला नव्हता. ते घरीच बसून होते. कमालीचे अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली.
दरम्यान, तुपकर यांच्या स्वाभिमानीमधील पुनरागमनामुळे सदाभाऊंना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर शेट्टी यांच्या गटाला त्यामुळे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…