व्हॉटसॲपच्या आधारावर लोकांवर गुन्हे दाखल व्हावेत आणि त्या आधारावर त्यांना शिक्षा व्हावी. लोकांची खाजगी माहिती गोळा करता यावी. हे सगळे गंभीर आणि खतरनाक आहे. सोशल मीडियावर (social media) निर्बंध आणि त्याआधारावर लोकांना तुरुंगात टाकण्यासाठीच केंद्र सरकारचा (Central Government) हा सारा खेळ सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
आरक्षाणाचा निर्णय मोदींनी घ्यावा, त्यांच्या हातात हुकूमाची पाने आहेत ; संजय राऊत
सोशल मिडियावर बंदी घातली तर भक्तमंडळ आनंदसोहळा कसे साजरा करणार?; शिवसेनेचा टोला
Social media companies need to be regulated – but BJP’s moves are aimed at controlling the narrative
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. आज भाजप केंद्रात सत्तेत आहे. या सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातूनच भाजप सत्तेवर आली आहे. आता त्याच सोशल मीडियावर (social media) भाजप आज अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका मलिक यांनी केली.
केंद्राविरोधातील वातावरणामुळे…
सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून देशातील जनता केंद्र सरकारच्या (Central Government) विरोधात बोलत आहे. आपले म्हणणे प्रखरतेने मांडताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून विरोधात वातावरण निर्माण होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याला अंकुश लावण्याचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकार करत आहे, असा आरोप मलिक यांनी केला.
भाजपच्या कुटील डावाला विरोध
आज व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु न्यायालय व्हॉटस्ॲप चॅट कायदेशीर पुरावा मानत नाही. परंतु, केंद्रातील भाजप सरकार व्हॉटस्ॲप चॅटच्या आधारावर गुन्हे दाखल व्हावेत. त्याआधारे लोकांना शिक्षा व्हावी या प्रयत्नात आहेत. दरम्यान भाजपच्या या कुटील डावाचा आणि लोकांच्या खासगी आयुष्यात घुसण्याच्या कार्यक्रमाला आमचा तीव्र विरोध आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…
जुने नाशिक येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…
वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…
मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…
सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…
भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…