राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टवरून संकेत देत भाजपवर निशाणा साधला आहे. ‘राज्यघटनेनं दिलेला आवाज उठवण्याचा हक्क चिरडायचे प्रयत्न कपटी शत्रू करत असेल तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या मार्गानंही लढावं लागेल,’ असं पवार यांनी म्हटलं आहे.
अडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लाँड्रिंगशी संबधित प्रकरणात ईडीनं मलिक यांना अटक केली आहे. मात्र, हे सर्सार चुकीचे आहे. महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. मलिक यांच्या निमित्तानं केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजपनं हा राजकीय डाव साधत आहे असेही ते म्हणाले. त्यामुळे आता या कारवाईला जशास तसं उत्तर द्यावं, अशी मागणीही पक्षातून केली जात आहे. तर दुसरीकडं भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू असून त्यांच्या बचावासाठी पुढं आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली जात आहे.
हे सुद्धा वाचा
नवाब मलिकांच्या घरासमोर कार्यकर्त्यांने लावला बॅनर; कुछ ही देर की….
देवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षापूर्वीच्या तक्रारीचे काय? राष्ट्रवादी नेत्यांनी उभे केले नवे प्रश्न
भाजपाच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा
Opposition Sharad Pawar play heats up after NCP projects party chief as PM material
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी बिहारमधील मागील निवडणुकाचा संदर्भ देत आणि आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकाचा संबंध जोडत एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये पवार यांनी महटलं आहे, ‘बिहारच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी पेटवण्यात आलेलं अभिनेत्याचं आत्महत्या प्रकरण निवडणूक संपताच शांत झालं, कदाचित २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यात येईल.
त्याभवी महाराष्ट्रात केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने दबावतंत्राचं राजकारण करून उत्तर प्रदेशातील उर्वरित टप्प्यांसाठी व आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हा भाजपचा प्रयत्न असावा, असे ते म्हणाले. आरोप करून रान उठवायचं, बदनामी करायची असे प्रयत्न जर ते करत असतील , तर त्याविरोधात गांधीजींच्या सत्याच्या मार्गासोबतच भगतसिंग, राजगुरूंच्या आक्रमकतेच्या व सत्याच्या मार्गाने आम्हालाही लढावं लागेल. असा इशारा देत भाजपवर टीका केली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…