राजकीय

विधानसभा अध्यक्षांविरोधात शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार

सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्ष पोहचल्यानंतर अनेक महिने यावर या न्यायालयात सुनावणी पार पडल्यावर 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा असे सांगितले होते. याला दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर कोणताच निर्णय देत नसल्याने शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरवले आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते हे पाहणे औत्सुकयाचे झाले आहे.

एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपाशी घरोबा केला होता. शिवसेनेतील ४० आमदार, 10 अपक्ष आमदार आणि काही खासदारांना बरोबर घेऊन त्यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा केला. शिवसेना पक्ष म्हणून भाजपाशी युती करून सरकार स्थापन केलं. तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर ११ मे रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कामकाजावर ताशेरे ओढले, तसेच विधिमंडळात घडलेल्या अनेक घडामोडींवर नाराजी व्यक्त केली. परंतु आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला.

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलं. या सुनावणीला आता दोन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने आता विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आहे.

ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंबंधी लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत. सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी झालेल्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेसंबंधी निर्णय घायला सांगितलं होतं. या आमदारांविरोधात पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे.

हे सुध्दा वाचा:

अजित पवारांच्या आमदारांची संख्या अजून कळेना

जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे अजितदादांच्या भेटीला; इकडे सोनाली तनपुरे यांचे महत्त्वाचे ट्विट

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नवी डोकेदुखी; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना अनुभवानुसार खाती पाहिजेत

सुनील प्रभू यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, सुप्रीम कोर्टाने ११ मे रोजी दिलेल्या निकालात सांगितलं होतं की, आमदारांच्या अपात्रतेसंबंधीचा निर्णय वाजवी वेळेत घ्यावा. परंतु यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी अद्याप कोणतंही पाऊल उचलेलं नाही. आम्ही (ठाकरे गट) विधानसभा अध्यक्षांना आतापर्यंत तीन वेळा निवेदन दिलं आहे, परंतु त्याचा काही परिणाम झाला नाही.

विवेक कांबळे

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

12 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

13 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

14 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

15 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

15 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

15 hours ago