Categories: राजकीय

Tej Pratap Yadav: तेज प्रताप यादव व श्याम रजक यांचा राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये धिंगाणा

बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव रविवारी झालेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून बाहेर आले आणि पक्षाचे नेते श्याम रजक यांनी त्यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दिल्लीतील राजदची बैठक अर्धवट सोडून निघालेल्या तेज प्रताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा आरोप केला. त्या संपूर्ण घटनेचा ऑडिओही आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारणा केल्यानंतर तेज प्रताप यादव म्हणाले की, शिवीगाळ ऐकण्यासाठी मी सभेत का थांबणार? श्याम रजकने मला शिवीगाळ केली आणि बहिणीलाही शिवीगाळ केली. त्याने माझ्या पीएलाही शिवीगाळ केली. माझ्याकडे त्याची ऑडिओ क्लिप असून ती मी सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे.

यासोबतच त्यांनी श्याम रजक हे आरएसएस आणि भाजपचे एजंट असल्याचा आरोप करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. रजक यांना सभेच्या वेळेबाबत विचारले असता त्यांनी उत्तरात शिवीगाळ सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

तेज प्रताप यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना श्याम रजक यांनी म्हटले आहे की, तेज प्रताप यादव काहीही म्हणोत. तो मोठा माणूस आहे आणि मी दलित माणूस आहे.

राजदच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये तीन प्रस्ताव मांडण्यात आले –

या बैठकीबाबत बोलताना आरजेडी नेते मनोज झा म्हणाले की, आम्ही बैठकीत तीन प्रस्ताव मांडले आहेत, त्यावर राष्ट्रीय अधिवेशनात चर्चा केली जाईल. लालू यादव, तेजस्वी यादव आणि शरद यादव यांनी दिलेल्या भाषणांचा अर्थ असा आहे की, सध्या भाजपकडून मूळ विषयांवरून लक्ष वळवण्यासाठी देशात वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. झा पुढे म्हणाले की, बिहारमधून सुरू झालेले वादळ संपूर्ण देशात पसरेल, आम्ही सर्व मतभेद विसरून हातमिळवणी केली आहे.

हे सुद्धा वाचा –

Baramati Election: बारामती जिंकण्याची ताकद फक्त महादेव जानकरांमध्येच, रासपचे भाजपला आव्हान !

Student Scholarships: ऑक्टोबर ते डिसेंबर च्या काळामध्ये विद्यार्थी या तीन शिष्यवृत्त्यांसाठी अर्ज करू शकतात

Uddhav Thackeray Live : ’40 रावणांनी मिळून श्रीरामांचा धनुष्यबाण गोठवला’, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर टिपण्णी –

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिव्यवस्थेवर भाष्य केले होते, त्यांच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मनोज झा म्हणाले की, ते स्वत: मनुवाद पसरवण्याचे काम करत आहेत आणि त्यांच्या तोंडून अशा प्रकारचे व्यक्तव्य चांगले दिसत नाही. मोहन भागवत यांना आधी संघटनेतील व्यवस्था बदलावी, मग इतरांना विचार करायला सांगावे.

दिल्लीत राजदची दोन दिवसीय बैठक होत असून आज पहिल्या दिवशी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली.

अश्विन शेश्वरे

He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

6 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

6 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

7 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

8 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

8 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

8 hours ago