आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, अशी तक्रार काँग्रेसच्या दिग्गज नेत्या तसेच महिला आणि बालविकास मंत्री ठाकूर यांनी पोलिसांना फोनवरुन दिली होती.
पवारसाब और दादाने जिल्हा बँकमें राजे लोगों को एकही मारा लेकिन सॉलिड मारा
“हेलिकॉप्टर अपघातानंतरही सीडीएस रावत जिवंत होते; अग्निशमन कर्मचाऱ्याचा दावा
काय आहे प्रकरण?
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. दुपारच्या सुमारास बैठक आटोपल्यानंतर पालकमंत्री आपल्या वाहनाकडे जात असताना काही अभ्यागत त्यांना निवेदन देण्यासाठी पुढे आले. ज्यामध्ये ओबीसी महासभेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गाढवे हा युवक आपल्या काही सहकाऱ्यांसह उपस्थित होता.
नेमकं काय घडलं?
मागील महिनाभरापासून एसटी कर्मचारी उपोषण करत आहेत. आपण सरकार म्हणून त्यांची दखल घ्यावी आणि तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी प्रवीण गाढवे यांनी आपल्या निवेदनातून केली. मात्र अचानक कुणालाही काही कळण्याच्या आतच प्रवीण आणि पालकमंत्री यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आणि पालकमंत्र्यांचा पारा चढला.
“आय. सी. सी. चे कोड्यातील प्रशासन“ : अभय गोवेकर (पुर्वार्ध)
यशोमती ठाकूर यांचा आरोप काय?
संबंधित तरुणाने आपल्याला ‘बघून घेण्याची’ धमकी दिली, अशी तक्रार पालकमंत्र्यांनी गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवरुन दिली. आपल्या जीवाला काही बरे वाईट झाले, किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला सर्वस्वी हा तरुण जबाबदार राहील, असेही पालकमंत्री ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत सांगितले.
आरोपीचं म्हणणं काय?
पोलिसांनी तातडीने धाव घेत जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रवीण गाढवे याला ताब्यात घेतले. त्यावेळी संबंधित तरुण हा ओबीसी महासभेचा राज्य अध्यक्ष असल्याची माहिती मिळाली आहे. तर याबाबत प्रवीण गाढवे यांची प्रतिक्रिया घेतली असता, तुम्ही राजकारण करत आहात. मलाच पालकमंत्री ठाकूर यांनी धमकी दिला, असा आरोप प्रवीण गाढवे यांनी केला.
तर याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल झाली नाही, अशी माहिती गाडगेनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी दिली.
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…
लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…
मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…