मुंबई : काँग्रेस विरूध्द महाआघाडी सामना जोरात रंगला आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप जोरदार सुरु आहे. या देशात अमर, अकबर, अँथनी कधीही गुण्यागोविंद्याने आणि एकत्र राहू नयेत. असे भाजपच्या स्थापनेपासूनच त्यांना हे वाटत आले आहे. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीही बंच ऑफ थॉट्स मध्ये हीच शिकवण दिली आहे. इतिहास या गोष्टीचा साक्षीदार आहे. बाकी महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
काय आहे प्रकरण…
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येतील प्रभू रामचंद्र मंदिराच्या भूमिपूजनासाठी जाणार की नाही? याची चर्चा सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उद्धव ठाकरे अयोध्येला जातील असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, भाजपा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. निमंत्रण आले नसले तरीही रामभक्त म्हणून उद्धव ठाकरे अयोद्ध्येला जाणार का? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर पहले मंदिर फिर सरकार असं म्हणणारे ठाकरे आथा पहले सरकार फिर मंदिर म्हणत आहेत असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं होतं. याच टीकेला सत्यजीत तांबे यांनी उत्तर दिलं आहे. सध्या महाविकास आघाडी विरुध्द भाजप असा सामना जोरात रंगला आहे.
शहराच्या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्यावर संशयितांना…
मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…
मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…
गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…