लय भारी न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ऐरोली मतदारसंघातून माजी मंत्री गणेश नाईकांचे पुत्र संदीप नाईक यांना भाजपची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, आज संदीप नाईक यांनी माघार घेतली. आता त्यांच्याऐवजी वडील गणेश नाईक ऐरोलीतून लढणार असून त्यांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.
गणेश नाईकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या धोरणानुसार वयाच्या पंचाहत्तरीनंतर निवडणुका लढविण्यास संधी दिली जात नाही. गणेश नाईकांचे सत्तरीत आहेत. त्यामुळे आता निवडणूक लढविली नाही, तर पुन्हा कधीच संधी मिळणार नाही. त्यामुळे गणेश नाईकांना शेवटची संधी मिळायला हवी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे संदीप यांनी मोठे मन करून आपला मतदारसंघ वडिलांना दिला आहे.
गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबियांनी आणि राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी गेल्या महिन्यांत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नाईक हे दोन तिकीटांसाठी प्रयत्न करत होते. बेलापूरमधून गणेश नाईक, तर ऐरोलीमधून संदीप नाईक यांना तिकिट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, भाजपाने एकाच कुटुंबात दोन तिकीट देण्यास नकार दिला.
गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…