शेती आणि शेतकरी उद्धवस्त करणारे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी नवी दिल्लीच्या वेशीवर गेली 22 दिवस आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा देताना नेटीजन्सच्या दबावापुढे फेसबुकने झुकून (shamefacebook) किसान एकता मोर्चाचे फेसबुक पेज पुन्हा सुरू केले आहे.
शेतकरी आंदोलनाला दिवसेंदिवस मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून हे आंदोलन समाज माध्यमातून आणखी पसरू नये या साठी विविध क्लुप्त्या सरकार कडून करण्यात येत आहेत. यासाठी सुरुवातीला इंटरनेट सुविधा खंडित करण्यात आली होती. तसेच काही पोर्टल आणि संकेत स्थळावर बंदी घालण्यात आली. याचाच एक मोठा भाग म्हणून किसान एकता मोर्चाने सुरू केलेल्या फेसबुक पेजवर फेसबुक ने बंदी घातली होती. कम्युनिटी स्टँडर्ड व्हायोलन्स चे कारण देत ही बंदी घालण्यात आली. पण याचा उलटा परिणाम पाहावयास मिळाला. त्यामुळे शेतकरी आंदोलनास पाठींबा देणाऱ्या समाजातील सर्वच स्तरातून नेटीजन्स नी फेसबुक ने घेतलेल्या या निर्णयाचा जोरदार निषेध #shamefacebook या नावाने करत मार्क झुकरबर्ग यांनाही टॅग केले. अमेरिकेत असलेल्या काही शीख तरुणांनी याबाबत मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तसेच नवीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेंन यांना मेल पाठविले. तसेच समाजमाध्यमातून त्याबाबत आवाज उठविण्यात आला.
नेटीजन्स च्या या वाढत्या दबावापुढे झुकत अखेर फेसबुक ने किसान विकास मोर्चाचे बंद केलेले फेसबुक पेज अखेर सुरू केले. दरम्यान या शेतकरी आंदोलनाने आता पंजाब आणि हरयाणा येथील गावागावात मोठा परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. अनेक गावांत असलेले जिओ चे मोबाईल टॉवर्स आता खाली उतरविण्यास सुरुवात झाली आहे. तर अनेक ठिकाणी असलेले रिलायन्स मार्ट बंद करण्याचा दबाव वाढत आहे. रिलायन्स च्या बहिष्काराला आता गावागावात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…
शहराच्या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्यावर संशयितांना…
मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…
मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…