लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावावर ‘महाविकास आघाडी’तील सर्व पक्षांनी आज शिक्कामोर्तब केले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना पवार यांनी बाळासाहेबांसोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शरद पवार म्हणाले की, आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता. बाळासाहेब ठाकरे व जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी माझे व्यक्तीगत संबंध फार चांगले होते. आम्ही एकत्र येत असल्याचे पाहून बाळासाहेबांना खूप आनंद झाला असता. जाहीर व्यासपीठावर बाळासाहेबांनी माझ्यावर टीका करताना भरपूर शब्द वापरले. पण त्यांनी व्यक्तीगत सलोखा सोडला नाही. आम्ही जाहीर सभेत एकमेकांचा समाचार घ्यायचो. पण त्याच दिवशी जेवायला मिनाताईंकडे जायचो. या देशात अनेक नेते मोठे आहेत. ज्यांनी अनेकांना घडवले. यात बाळासाहेबांचाही समावेश आहे. चंद्रकांत खैरेंसारख्या सामान्य व्यक्तीला त्यांनी मोठे बनविले. दत्ता नलावडेंसारख्यांना बाळासाहेबांच्या व्यापक दृष्टीने घडविले. ती दृष्टी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घडेल. महाराष्ट्राचा कारभार योग्य दिशेने चालविण्याची जबाबदारी आम्ही उद्धव ठाकरे यांच्यावर सोपविली आहे. मी पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना विनम्रतेने सांगितले होते. देशात वेगवेगळ्या भाषा, धर्म, जाती असतात. देशाचे नेतृत्व करणारे तुम्ही आहात. महाराष्ट्र हा एक महत्वाचा घटक आहे. केंद्र व राज्य सरकार वेगळे असेल तर विकास होत नाही असे म्हटले जाते. पण चिंता करण्याचे कारण नाही, असा दिलासा त्यांनी दिला.
येत्या १ डिसेंबर रोजी शिवतिर्थावर होणार शपथविधी
शरद पवार म्हणाले की, उद्या सकाळी ८ ते ५ या वेळेत शपथ होईल. त्यानंतर काही काळ विश्रांती होईल. पुन्हा मंत्रीमंडळाच्या बाबतीत काही निर्णय घेतले जातील. तिथूनच तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांकडे जातील. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याबाबत राज्यपालांना माहिती दिली जाईल. नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी येत्या १ तारखेला शिवतीर्थावर होईल, असे सांगतानाच शिवतीर्थाची जागा पुरेल का अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. हा केवळ शपथविधीचा हा सोहळा नसेल तर सामान्य लोकांच्या जिवनांत सोहळा साजरा करण्याची परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार करेल, असा आशावादही पवार यांनी व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा
शरद पवारांनी शिवसेना स्टाईलमध्ये दिला ‘हा’ आदेश
…अन् भाजपच्या नेत्यांचे चेहरे उतरले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही राजीनामा, शिवसेनेवर डागली पुन्हा तोफ
राजकीय भूकंप : अजित पवार यांनी राजीनामा दिला, प्रतिभाताई पवार यांच्यामुळे अजितदादांची माघार
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…