टॉप न्यूज

भाजपच्या मानसिक विकलांगतेचा तमाशा; अर्णब प्रकरणावरून शिवसेनेचा हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई l महाराष्ट्रात २०१८ साली एका माय-लेकरांनी आत्महत्या केली ते प्रकरण तत्कालीन सरकारने दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीस पकडले व त्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी सुरू असताना भाजपाचे पुढारी वेडेखुळेच बनले. ते म्हणतात, जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले ‘महात्मा’ सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळ्या फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे, असे म्हणत शिवसेनेने भाजपाला टोला लगावला.

नशीब की, याप्रश्नी भाजपाने राज्यव्यापी जेल भरो, साखळी उपोषणे यांसारखे प्रयोग सुरू केलेले नाहीत. मनाने भरकटलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अमेरिकेत जसे वागत आहेत तसेच ‘डिट्टो’ महाराष्ट्रातील भाजपा पुढारी वागू लागले आहेत, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांना टोला लगावला.

आणीबाणीसारखी परिस्थिती कोण निर्माण करीत आहेत व अराजक कुणाला हवे आहे ते आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे भंजन करण्याचे हे कारस्थान दिसत आहे. मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या संशयित आरोपीचा निकाल रस्त्यावर उतरून कसा काय होऊ शकतो?

गुजरातमध्ये गोध्राकांड व इतर प्रकरणांत अमित शहांपासून अनेक भाजप नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले. या सर्व कारवाया सूडाच्याच होत्या असे शहा यांचे म्हणणे असले तरी त्यासाठी भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने केली नाहीत व कायद्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला नाही.

आज सदोष मनुष्यवधप्रकरणी सरकारवर, ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्य़ांनी याचे भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्या बाबतीत घडले त्याची पुनरावृत्ती हिंदुस्थानात घडायला वेळ लागणार नाही. भाजपवाल्यांचे डोके इतके कामातून गेले आहे.

दिल्लीच्या रस्त्यांवर उद्धव ठाकरे व इंदिरा गांधी यांची पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालिशपणा तर आहेच, पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधींशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. ‘हिंदुस्थान’च्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला.

असे धाडस पाकिस्तानच्या बाबतीत एकाही ‘मर्द’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आले नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव जरूर झाला, पण त्याच इंदिरा गांधींना देशाच्या जनतेने पुन्हा विजयी केले. देशाच्या अखंडतेसाठी इंदिराजींनी शेवटी प्राणाचे बलिदान दिले.

असा दुर्दम्य त्याग नंतर एखाद्या तरी पंतप्रधानाने केला असेल तर दाखवा. त्यामुळे भाजपने दिल्लीच्या रस्त्यावर इंदिराजी व उद्धव ठाकरे यांचे एकत्र चेहरे लावले असतील तर त्याचे स्वागत आहे. यानिमित्ताने त्यांनी पाळण्यात बसून पुन्हा इतिहासाचे वाचन केले तर बरे होईल. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळ्या पट्ट्या आणि पायांत गुलामीचे घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही.

पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदांवरील व्यक्तींचा एकेरी आणि ‘अरे-तुरे’च्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे. म्हणजे त्यांच्या दंडावरील काळय़ा पट्टय़ांचे आम्हीही स्वागत करू. अमित शहा, मोदी वगैरे नेत्यांशी मतभेद असू शकतात. म्हणून ‘एकेरी’वर जाऊन त्यांच्यावर चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही.

राजकारणात देशाचे वाटोळे होऊ नये, देशाचे स्वातंत्र्य, लोकशाहीचा सदोष मनुष्यवध घडू नये हीच आमची प्रामाणिक इच्छा. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे.

राजीक खान

Recent Posts

जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची टंचाई

नासिक महानगरपालिका जुने नाशिक विभागामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई (Water scarcity) असते व आहे. अर्धा…

43 seconds ago

छोटा हत्ती गाडी झाली पलटी; बॉक्समधून 7 कोटी रुपये आले बाहेर

आंध्र प्रदेशात आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. काल एनटीआर जिल्ह्यात…

16 mins ago

जुने रितीरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर भाष्य करणारा ‘ लाईफ लाईन ‘

क्रिसेंडो एन्टरटेनमेंट निर्मित, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ' लाईफ लाईन ' ( Life Line) ह्या…

34 mins ago

शांतिगिरी महाराजांमुळे महायुतीचा विजय अवघड : अभिजित पानसे

लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या शांतिगिरी महाराज(Shantigiri Maharaj) यांच्यामुळे शिवसेना-भाजपची डोकेदुखी वाढली असून, असे…

44 mins ago

डॉ. सुजय विखेंची चिडचिड, ७ मोबाईल फोडले !

लय भारीचा नगर मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. या दौ-यादरम्यान मतदार संघातील शेतक-यांशी,…

4 hours ago

विखेंच्या संस्थेतील उच्च शिक्षीत तरूणी म्हणते, डॉ. सुजय कुचकामी !

लय भारीचा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे(Information about Vikhe Patil).…

4 hours ago