या एसएमएसमध्ये बँकेने म्हटले आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना कळू इच्छितो की बँकेने क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व सेवांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दहा फेब्रुवारीपासून सुधारित दर लागू होतील.
कोव्हिडच्या काळात लसीकरण हेच एकमेव “शस्त्र”
ICICI बँकेचं ‘डिजिटल’ पाऊल: कस्टम ड्युटी ऑनलाईन, घरबसल्या करा पेमेंट!
नव्या दरानुसार बँकेच्या सर्व प्रकारच्या क्रेडिट कार्डवर 2.50 टक्के ट्रांझेक्शन फी आकारली जाईल. ही फी कमीत कमी 500 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच ऑटो डेबिट फेल झाल्यास किंवा चेक बाऊंस झाल्यास देखील संबंधित ग्राहकांकडून दोन टक्के दंड वसूल करण्यात येईल.
बँकेच्या नव्या नियमानुसार जर तुमच्याकडे बँकेची 100 रुपये थकबाकी असेल तर त्यावर कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही. मात्र ही रक्कम जर 100 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत असेल तर त्यावर विलंब शुल्क म्हणून तुमच्याकडून 100 रुपयांची वसुली करण्यात येईल. जर तुमच्याकडे 501 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतची थकबाकी असेल तर त्यासाठी तुमच्याकडून विलंब शुल्क म्हणून 500 रुपये आकारले जातील. जर ही थकबाकी 10,000 रुपये असेल तर 750 रुपये आणि 25,000 हजारांच्या आतील रकमेसाठी 900 आकारण्यात येणार आहेत.
आपण मजूर आहात का? सहकार विभागाची दरेकरांना नोटीस
SBI vs HDFC vs ICICI vs Axis vs PNB vs Kotak: Check Doorstep Banking Service Charges
लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड
ग्राहकांनी क्रेडिट कार्डशी संबंधित सेवांच्या शुल्कामध्ये करण्यात आलेल्या वाढीची नोंद घ्यावी, नवे शुल्क येत्या दहा फेब्रुवारीपासून लागू होतील. बँकेला सहकार्य करावे असे आवाहन देखील बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान ज्या ग्राहकांचे आयसीआसीआय बँकेमध्ये सॅलरी अकाऊंट आहे, अशा ग्राहकांसाठी बँकेच्या वतीने लाईफ टाईम फ्री क्रेडिट कार्ड देण्यात येते अशा क्रेडिट कार्डवर बँकेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही.
नाशिक जिल्ह्यात शिक्षकांच्या वेतनास ग्रहण लागले आहे.प्राथमिक शिक्षकांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच व्हावेत, यासाठी…
एकीकडे परवानगी नसल्याने आवर्तन सोडणार नाही असे महिनाभर अगोदरच सांगण्यात आले आणि आता कोणाच्या परवानगीने…
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)…
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…
गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…
दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…