व्हिडीओ

VIDEO : मुंबई अग्निशमन दलातर्फे गणेशोत्सव मंडळाना अग्नि सुरक्षेचे धडे

गणरायाचे आगमन झाले असून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती पाहण्यासाठी भाव‍िकांची गर्दी जमू लागली आहे. अशा वेळी काही अनुचित प्रकार घडला म्हणजे आग किंवा शॉर्टसर्कीट सारखी घटना घडून आग लागली तर काय करावे या बद्ल मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या स्वयंसेवकांना अग्नि सुरक्षेबद्ल माहिती देण्याचे काम मुंबई अग्निशमन दल करत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येथे दररोज लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. या भाविकांना योग्य मार्गदर्शन करत रांगेत सोडण्याचे काम येथील स्वयंसेवक करत असतात. या स्वयंसेवकांना अग्नि सुरक्षेबद्ल माहिती मुंबई अग्निशमन दलाने प्रात्यक्षिकाद्वारे दिली.

मुंबई अग्निशमन दलाने प्रमुख अग्निशमन अधिकारी हेमंत परब यांनी मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना आवाहान करत गणेश उत्सव मंडळाने आणि येथील स्वयंकसेवकांनी आगी संदर्भात अग्नि सुरक्षा संदर्भात विशेष काळजी घ्यावी असे सांगितले आहे. मुंबईतीली गणेशोत्सव मंडळामध्ये जाऊन येथील कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष गाठी भेटी घेत अग्नि सुरक्षेचे धडे देण्याचे काम अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि जवानांकडून दिले जात आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जात आहे.

सचिन उन्हाळेकर

Recent Posts

शेतकरी म्हणाले नरेंद्र मोदींना कांदे फेकून मारणार,कांदे सभेत कसे नेणार ते मीडियाला नाही सांगणार

निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत असतानाच लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी…

4 hours ago

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

17 hours ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

18 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

18 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

19 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

19 hours ago