लोकसभा निवडणुकीचा(Loksabha Election 2024) तिसरा टप्पा लवकरच होवू घातला या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून घेण्यासाठी ‘लय भारी’ ची टीम शिर्डी लोकसभा मतदारसंघात पोचली(a journey of village boy ). यावेळी लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सोनाई परिसरातील एका तरुण व्यवसायकासोबत गप्पा मारल्या. जयकुमार अण्णासाहेब दराडे असं त्या तरुण व्यवसायकाचं नावं असून त्याने BBA मध्ये (Marketing) केलं आहे. त्याने गुऱ्हाळ व रसवंती चा व्यवसायचा चालू केला. त्याच म्हणणं आहे की कोणाच्या हाताखाली काम न करता स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे व स्वतः मालक राहिलं पाहिजे तो रसवंतीचा व्यवसाय करतो व त्याचबरोबर १००% ऑरगॅ निक गूळ देखील बनवतो व वेगवेगळ्या स्वादाचे देखील गूळ बनवले जातात जसं की पुदिना, अदरक, वेलची. १० ते २० लाख महिन्याला ह्या दोन्ही व्यवसायातून त्याची कमाई होते व त्याचबरोबर त्याने कामाला १७ माणसं देखील ठेवली आहेत. स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग त्याने ह्या व्यवसायासाठी केला आहे. मुंबई(Mumbai) आळंदी ह्या ठिकांवरून देखील त्याला गुळाच्या ऑर्डर येतात .
गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…