महिला टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघ भारतीय संघाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतात पोहोचणार आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेत संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. त्याचवेळी या मालिकेतील दुखापतीमुळे पूजा वस्त्राकरला वगळण्यात आले आहे.
मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होणार
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी टी-20 मालिका 9 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर मालिकेतील शेवटचा सामना 20 डिसेंबरला होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत खेळवले जातील, ज्यामध्ये पहिले दोन सामने डीवाय पाटील स्टेडियमवर आणि शेवटचे तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवले जातील. त्याचबरोबर या मालिकेतील दुखापतीमुळे पूजा वस्त्राकर बाहेर आहे.
हे सुद्धा वाचा
बाबासाहेब पुरंदरेंची मांडणी विकृत व अनहैतासिक, इतिहासकार जयसिंगराव पवार यांचे स्पष्टीकरण
लहानपणी वर्णद्वेष सहन करावा लागला होता, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांचा खुलासा
राज्यात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, एकट्या मुंबईत सर्वात जास्त रुग्ण !
महिला टी-20 विश्वचषक 2023 पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियन संघ यांच्यातील ही मालिका दोघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. वास्तविक, टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ विश्वचषकाचे प्रबळ दावेदार आहेत. हे पाहता या मालिकेत निकराची लढत होणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, देविका वायदा, अंजली सरवानी. एस मेघना, रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल.
ऑस्ट्रेलियन संघाच्या भारत दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रक
-9 डिसेंबर पहिला टी-20 सामना – डी वाय पाटील स्टेडियम
-11 डिसेंबर दुसरा टी-20 सामना – डी वाय पाटील स्टेडियम
-14 डिसेंबर तिसरा टी-20 सामना – ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम
-17 डिसेंबर चौथा टी-20 सामना – ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम
-20 डिसेंबर पाचवा टी-20 सामना – ब्रेबॉर्न क्रिकेट स्टेडियम
आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…
सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…
उद्धव ठाकरे यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले आहेत, घाबरलेले…
शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…