क्राईम

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक ( Bus-truck accident) यांचा भीषण अपघात झाला आहे.चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात ( Bus-truck accident) झाला आहे. या अपघातात 5 ते 6 प्रवाशी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.( Bus-truck accident on Mumbai-Agra highway)

जळगावहून वसई येथे जाणाऱ्या वसई आगाराची बस (एमएच १४, केक्यू ३६३१) ही चांदवडजवळील देवी मंदिराजवळील हॉटेल ग्रीन व्हॅलीजवळ आली असता, ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. या अपघातात बसचा वाहकाकडील अर्धा भाग अक्षरशः पूर्णपणे कापला गेला होता.

याच बाजूने पुढे बसलेल्या प्रवाशांना अपघातात आपला जीव गमवावा लागला. अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने अनेकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी जखमींचा आक्रोश, रक्ताचा सडा व रस्त्यावर पडलेले प्रवासी इतकं भयावह चित्र होते.

अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपअधीक्षक बाजीराव महाजन, पोलिस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी शेवटच्या प्रवाशाला मदत होईपर्यंत उपस्थित होते. सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. जखमींना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अत्यवस्थांना नाशिक, पिंपळगाव व मालेगाव येथील रुग्णालयांत पाठविण्यात आले. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३५ व्यक्तींना दुखापत झाली आहे. यापैकी आठ ते नऊ प्रवासी गंभीर असून, दोन पुरुष, एक अल्पवयीन मुलगा व एक महिला, अशा चार जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही जखमींची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.

यामुळे या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातावेळी चांदवडच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. मिळेल त्या वाहनाने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ करीत होते. उपजिल्हा रुग्णालयात मृतांचे नातेवाईक व जखमींच्या नातेवाइकांचा आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.

अपघातातील मृतांची नावे

खालिदा गुलाम हुसेन (वय ६०, रा. दर्गा रोड, भोईवाडा पोलिस ठाणे चाळ, भिवंडी), सुरेश तुकाराम सावंत (२८, रा. डोंगरगाव, ता. देवळा), साईल संजय देवरे (१४, रा. उमराणे), बळिराम सोनू अहिरे (६४, रा. शांतिवन कॉलनी, नाशिक).

टीम लय भारी

Recent Posts

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

25 mins ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

3 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

4 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

4 hours ago

मधमाशी सौंदर्य खुलवते, आजार बरे करते

सदर व्हिडीओ मध्ये बिपीन जगताप उपमुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ आपणास…

4 hours ago

मधमाशीकडून शिका बिझनेस मॅनेजमेंट

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

6 hours ago