संपादकीय

कुमारस्वामी ते तिवारी, थरूर आणि मुंडे!

  • अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार

राजकारणात आणि समाजकारण यामध्ये असलेली कोणतीही व्यक्ती ही नेहमीच प्रत्येकाच्या थर्ड आय वर (gossip) राहिलेली असते. या व्यक्तींचे सामाजिक, खासगी जीवन आणि गुप्त पण काहो खुमासदार वर्तन हे सातय्याने चवीने चर्चिले जाते. मग या चर्चा थेट अशा व्यक्तीच्या बेडरूम पर्यन्त जातात. नको तितका रस घेऊन या प्रकारात संपूर्ण वस्त्रहरण करण्याचा मालिका सुरू होते. याच मालिकेतील नवा हिरो आता आहे ते म्हणॆ सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे.

धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपाने वातावरण ढवळून निघत असतानाच मुंडे यांनीच फेसबुकवर या संपूर्ण प्रकरणावर स्वतःला व्यक्त केले. बलात्काराचा आरोप करणारी तरुणी ही मुंडे यांच्या दुस-या पत्नीची सख्खी बहीण असल्याचे निष्पन्न झाले. मुंडे यांनी आपण दुसरे लग्न केले असल्याचे कबूल करून या पत्नी पासून झालेल्या अपत्यांना आपले नाव लावल्याचे मुंडे यांनी या पोस्ट मध्ये नमूद केले आहे. मुळात मुंडे यांनी दुसरा विवाह का केला , कधी केला याची यापूर्वी कधीही जाहीर वाच्यता झाली नव्हती. या पोस्ट मध्ये त्यांनी मेहुणीने केलेल्या आरोपाचे खंडन केले.

आता या निमित्ताने देशाच्या राजकीय वर्तुळात यापूर्वी अनेक नेत्यांच्या खासगी आयुष्याबद्दल उठलेल्या वादळाची उजळणी सुरू झाली. जी प्रकरणे आतापर्यंत जाहीरपणे चर्चिली गेली आहेत त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री , माजी राज्यपाल अशो विविध पदे भूषविलेल्या नारायणदत्त तिवारी यांचे नाव अग्रक्रमाने येते. तिवारी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी विवाह केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते.तत्पुर्वी ज्या महिलेशी त्यांनी विवाह केला होता त्या उज्वला शर्मा यांचा मुलगा रोहित शेखर याने नारायणदत्त तिवारी हेच आपले वडील असल्याचे सांगून न्यायालयीन लढाई लढली होती. त्यासाठी मग डीएनए चाचणी करण्यात आल्यावर रोहित हाच नारायनदत्त तिवारी यांचाच मुलगा असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मग तिवारी यांनी आपण दुसरा विवाह 14 मे 2014 साली केला होता याची कबुली दिली. त्याआधी त्यांचा पहिला विवाह 1954 मध्ये झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची देशभर खुमासदार चर्चा झाली होती.

याच साखळीतील आणखी एक नाव म्हणून शशी थरूर हे समोर येते. रंगील आणि बिनधास्त वर्तन अशी सर्वदूर ओळख असलेल्या थरूर यांनी आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. त्यापैकी तिसरी पत्नी सुनंदा पुष्कर यांचा गूढ मृत्यू आणि त्यामधून उठलेले संशयाचे वादळ यामुळे थरूर चर्चेत होते. एरव्हीही ते कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री च्या सलगी मुळे चर्चेत असतात.

याच श्रुखलेतील आणखी एक मोठे नाव म्हणजे कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे नेते कुमारस्वामी. कन्नड अभिनेत्री राधिकाबरोबर कुमारस्वामी यांनी गुप्त विवाह केला होता. या विषयावर प्रचंड आरोप प्रत्यारोप होऊन कुमारस्वामी यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली होती. कुमारस्वामी यांचा हा दुसरा विवाह. पहिल्या पत्नी पासून त्यांना एक मुलगा आहे. तर राधिकापासून त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले आहे. या छुप्या विवाहावरून एकच गदारोळ उठला होता. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. हिंदू वैयक्तीक कायद्याअंतर्गत त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. पण सबळ पुराव्याअभावी ही याचिका फेटाळली गेली.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतही अप्सरा आणि बरखा या चौफुला येथील तमाशा नर्तिकीवरून मोठे वादळ उठले होते. तर सांगलीच्या एका खासदाराचे आणि कोल्हापूर मधील एका आमदाराचे नाव लोकप्रिय अभिनेत्री बरोबर जोडून त्याची गावभर चर्चा करण्यात येत होती. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक अभिनेत्रीची नावे आजही काही लोकप्रतिनिधी बरोबर जोडली जात आहेत. यामध्ये किती तथ्य हा महत्वाचा मुद्दा असला तरी लोकांचा त्या संपूर्ण काल्पनिक अथवा ख-या असलेल्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजमनात दिसुन येतो.

विविध क्षेत्रातील अनेक लोकप्रिय चेह-याची व्यक्तिगत आणि खासगी माहिती ही अनेकांना माहीत नसते. समाज अशा लोकांकडे एक आयकॉनिक म्हणून पाहत असतो. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात प्रवास करताना समाजातील अनेक जण आपल्याला फॉलो करत असतात याचे किमान भान तरी या सर्व मंडळींनी ठेवायला हवे.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

4 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

6 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

7 hours ago