मनोरंजन

आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य

टीम लय भारी

मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ आमिर खान (Aamir Khan) त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असतो. त्याचे आधी रीना दत्तासोबत लग्न झाले होते(Aamir Khan to tie the knot for third time)

त्यानंतर दिग्दर्शक किरण रावसोबत त्याने लग्नगाठ बांधली. 3 जुलै रोजी किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी आता चर्चेत आली आहे.

प्रियांकाची घटस्फोटाच्या चर्चांवर पहिली प्रतिक्रिया म्हणाली…

डुकाटीची Panigale V4 SP मोटारसायकल बाजारात, पाहा किंमत आणि फीचर्स

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आमिर एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत तिसऱ्यांदा लग्न करणार आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर त्याच्या लग्नाची घोषणा करेल, असे म्हटले जात होते. आता याबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.

आमिर तिसरे लग्न करतोय?

3 जुलै रोजी किरण आणि आमिरने घटस्फोटाची घोषणा केली. त्यांच्या घटस्फोटासाठी अभिनेत्री फातिमा सना शेखला जबाबदार धरण्यात आले होते. त्यानंतर आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार असल्याची बातमी आली. मात्र, त्याच्या जवळच्या सूत्राने ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे.

मराठी चित्रपटाची कथा पोहचली थेट बॉलीवूडमध्ये, ‘छोरी’ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

https://www.gulftoday.ae/culture/2021/11/23/reports-aamir-khans-third-wedding-could-be-a-promotional-gimmick

आमिरसोबतच्या नात्यावर बोलली फातिमा

आमिर खानला डेट करत असल्याच्या अफवेवर फातिमा सना शेखने तिची प्रतिक्रिया दिली. ‘दंगल’ चित्रपटानंतर दोघांची नावे जोडली जात होती. याबाबत फातिमा म्हणाली होती, ‘काही अनोळखी लोक, ज्यांना मी कधीही भेटले नाही, ते माझ्याबद्दल लिहित आहेत. त्यांना सत्य काय आहे, हे देखील माहित नाही.

त्यांचे लेखन वाचणाऱ्यांना वाटते की, मी चांगली मुलगी नाही. मला वाटतं त्या लोकांना मी सांगायला हवं वकी, मला विचारा, मी तुम्हाला योग्य उत्तर देईन. मला त्रास होतो, कारण त्यांनी माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नये, असे मला वाटते.’

किरण-आमिरचे लग्न अन् घटस्फोट

आमिर खानच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलायचे झाले, तर 2001 मध्ये त्याची किरण रावशी भेट झाली. दोघांनी ‘लगान’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात आमिर खान नायक होता आणि किरण राव सहाय्यक दिग्दर्शक होती. 2002 मध्ये आमिरने पत्नी रीना दत्तासोबत घटस्फोट घेतला होता.

यानंतर किरण आणि आमिर पुन्हा भेटले. दोघांनी 2005 मध्ये लग्न केले. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांनी आझाद राव-खान अर्थात मुलाचे स्वागत केले. आमिर आणि किरण वेगळे झाले आहेत, पण मुलासाठी ते नेहमी एकत्र राहतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

4 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

4 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

4 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

2 weeks ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

2 weeks ago