अभिनेता शाहरुख खानच्या बहुचर्चेत सिनेमा ‘जवान’मध्ये अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोलेनं महत्वाची भूमिका साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत भूमिकेबद्दल चकार शब्दही काढायचा नाही, अशी सक्त ताकीद निर्मात्यांकडून मिळाली आहे. शाहरुख खान सोबतचे तुम्ही फॅन असाल अन् त्याच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणं हा भन्नाट अनुभव समाधानकारक ठरल्याचं गिरीजा ओक-गोडबोलेनं सांगितलं. एका खासगी युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिनं शाहरुखबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.
“सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत भूमिकेबद्दल काहीच बोलायचं नाही, ज्याची आठवण करून देणारे सतत मेल्स येत आहेत. शाहरुखसोबत आम्ही सहा मुली आहोत. आम्ही नेमकं काय करतोय, यासाठी चित्रपट पहा ” असं गिरीजानं सांगितलं. “गेली दोन वर्ष या सिनेमाचा शूटिंग सुरू होतं. शूटिंग दरम्यान कमालीची सुरक्षा पाळूनही काही फोटो व्हायरल झालेत. कालांतराने शूटिंगच्या सेटवर मोबाईल बंदी घातली गेली. डबिंगच्या वेळी कलाकारांना पूर्ण चित्रपट पाहू दिलेला नाही. निर्मात्यांनी पायरसी रोखण्यासाठी योग्य खबरदारी घेतली”, असंही गिरीजानं स्पष्ट केलं.
“मी शाहरुखची प्रचंड मोठी फॅन आहे. शाहरुख बद्दल ऐकलेली प्रशंसा प्रत्यक्षात भलतीच निघाली तर भ्रमनिरास होईल या कल्पनेने मला खरं तर शाहरुख सोबत कधी कामच करायचं नव्हतं. मला शाहरुखला भेटायचंही नव्हतं. तरीही सगळं जुळून आलं. तुम्ही आतापर्यंत कधीही न पाहिलेली गिरिजा ‘जवान’ चित्रपटात पाहता येणार आहे. मी या चित्रपटात ॲक्शन सिक्वेन्सेस केले आहेत. ॲक्शन चित्रपट करण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे.” गिरीजा शाहरुख सोबत शूटिंग करण्याचा अनुभव सांगताना भरभरून बोलली. शाहरुखसारखा मोठा कलाकार सेटवर संवाद पाठ करून यायचा. सीन शूट करताना शाहरुखकडून चूक झाल्यास तो सह कलाकारांसह जुनिअर आर्टिस्टलाही सॉरी बोलायचा.
हे सुद्धा वाचा
तुम्हाला माहिती आहे का, जन्माष्टमीनंतर दहिहंडी का साजरी केली जाते ?
एकनाथ शिंदेंना जरांगे-पाटील यांना भेटायला वेळ नाही, पण ३० दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थिती
दहिहंडीमधील काळे गोरे, गाढवाने उलघडले पदर सारे !
जवान सिनेमाच्या शूटिंगच्या काळात शाहरुखचा मुलगा आर्यन खानवर पोलीस केस झाली. कुटुंबात एवढा मोठा आघात झालेला असताना शाहरुखने सर्व काही संयमाने हाताळलं. शाहरुखच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा ग्रेस आहे, या शब्दात गिरीजानं शाहरुखचा कौतुक केलं.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…