मनोरंजन

Raju Srivastav : एकेकाळी 50 रुपये मानधन घेणारा ‘राजू’ बनला विनोदाचा बादशाह

तब्बल 42 दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर विनोदवीर राजू श्रीवास्तव यांनी अखेर बुधवारी (ता. 21 सप्टेंबर) सकाळी जगाचा निरोप घेतला. 10 ऑगस्ट 2022 रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू श्रीवास्तव त्यांच्या जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्यावर एंजिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अनेक दिवस त्यांची तब्येत खालावली असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत होते. अखेर 42 दिवसांची राजू श्रीवास्तव यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, एकेकाळी केवळ 50 रुपये मानधन घेणारा साधा कलाकार विनोदाचा बादशाह कसा बनला याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.

राजू श्रीवास्तव यांचा जन्म 1988 साली एका कवी घराण्यात झाला होता. राजू यांना लहानपणापासूनच लोकांना हसवण्याची आवड होती. त्यामुळे आपली आवड जोपासत विनोदवीर होण्यासाठी राजू यांनी थेट मुंबई गाठली. एका मुलाखतीदरम्यान राजू यांनी आपल्या मनातील दु:ख उघड करत सांगितले की, “मी ज्यावेळी मुंबईत आलो होतो त्यावेळी विनोदी कलाकारांना लोकांकडून हवे तितके प्रोत्साहन मिळत नव्हते. त्यावेळी विनोद जॉनी वॉकरपासून सुरू होऊन जॉनी लिव्हरपर्यंत येऊन संपत असे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागली आणि त्यामुळे पैशांची अडचण मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली होती.”

50 रुपये मानधनावर झाली विनोदवीराची सुरुवात
राजू श्रीवास्तव यांनी एकेकाळी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवल्याचेही त्यांनी अनेकदा सांगितले आहे. मुलाखतीत त्यांनी या गोष्टीचा खुलासा करताना सांगितले होते की, त्यांच्या रिक्षातील लोकांना हसवण्यासाठी अनेकदा ते त्यांना जोक्स सांगत. त्यांच्या या कलाकृतीमुळे त्यांना रिक्षा भाड्यासोबत प्रवाशांकडून अधिकचे पैसे टीप स्वरुपात मिळतत. त्यातीलच एका प्रवाशामुळे त्यांना विनोद श्रेत्रात पहिले काम मिळाल्याचेही राजू यांनी सांगितले होते. ज्यावेळी त्यांना विनोद क्षेत्रात पहिले काम मिळाले त्यावेळी लोकांचे मनोरंजन करण्यासाठी विनोदवीरांना केवळ 50रुपये मानधन देण्यात येत होते.

गजोधर भैयामुळे घराघरात पोहचला राजू श्रीवास्तव
राजू त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बर्थडे पार्टीत जाऊन लोकांचे मनोरंजन करत असत. त्यानंतर अनेक काळ मेहतन केल्यानंतर राजू यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून. राजू श्रीवास्तव हे या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ स्पर्धेचे उपविजेते होते. या स्पर्धेत त्यांनी साकारलेले ‘गजोधर भैया’ हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. आणि त्याच्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात राजू श्रीवास्तव यांना लोकांचे प्रेम मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी आपली कला सादर करत असताना राजू श्रीवास्तव ‘गजोधर भैया’ला आपल्या सोबत घेऊन लोकांचे मनोरंजन केले.

हे सुद्धा वाचा

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Raju Srivastav : 15 दिवसानंतर कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत झाली सुधारणा

Tirupati Balaji : मुस्लिम जोडप्याचे तिरुपती बालाजीला कोटींचे दान

दरम्यान, कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जात राजू श्रीवास्तव यांनी आपली एक ओळख निर्माण केली. ही ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतली. त्यामुळेच आजवर विनोद क्षेत्रात त्यांनी निर्माण केलेली पात्र अजरामर आहेत. विनोदाच्या या बादशाहाने जगाचा निरोप घेतल्यानंतर संपूर्ण भारतभरात शोक व्यक्त केला जात आहे. आज राजू श्रीवास्तव आपल्यातून गेले असले तरी, त्यांनी जिवंत केलेला गजोधर भैया नेहमी स्मरणात राहिल अशी ग्वाही सिनेसृष्टीतून व्यक्त केली जात आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान

पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…

12 mins ago

काँग्रेसने मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कायमच विरोध केला; के. लक्ष्मण यांचा हल्लाबोल

मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…

1 hour ago

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

2 hours ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

2 hours ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

3 hours ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

3 hours ago