टीम लय भारी
वर्धाः यंदा राज्यातील शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होता. मात्र दरवर्षी प्रमाणे पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने सगळीकडे पाणीच पाणी झाले आणि उभी पिके पाण्यात गेली. सुरुवातीला पावसाच्या दडीमुळे तर नंतर सततच्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला.
पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला. यामुळे तूर, कपाशी, सोयाबीन पिकांचे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतजमीन पाण्याखाली जाऊन जिल्ह्यातील 30, 54 टक्के पिकांचे पूर्ण नुकसान झाले. या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.जिल्ह्यात तूर, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे उत्पन्न शेतकरी घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात 97, 62 टक्के म्हणजेच 4 लाख 2 हजार 119 हेक्टरवर विविध पिकांची लागवड झाली आहे.
पण जुलै महिन्यात 19 रोजीपर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 22 हजार 826, 7 हेक्टरवरील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात पाऊस लांबल्याने तब्बल चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. तर आता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर तिबार पेरणी करावी लागणार आहे.
हे सुध्दा वाचा:
VIDEO : ईडीच्या चौकशी विरोधात काँग्रेसचे आंदोलन पेटले
सोनिया गांधीच्या चौकशीवर ‘यशवंत सिन्हां’नी केली टीका
मोलमजुरी करुन ‘महापौर‘ झालेल्या तरुणाची घेतली राहूल गांधीनी दखल
उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…
गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…
दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…
या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…
फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…
गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…