गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले त्यांचे पुतणे व राज्याचे विद्यमान सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले आहे. यावेळी, ऊततोड कामगारांसाठीची तुमची लढाई मी माझ्या खांद्यावर घेतली असून त्यांच्यासाठी आयुष्य वेचेन, अशा शब्दात आठवणी ‘अप्पा, ऊसतोड कामगार बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे.
गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत प्रवेश
काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढणार, नाना पटोलेंची स्पष्ट भूमिका
ऊसतोड कामगार बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन, हा शब्द देतो. आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन;’ अशा शब्दात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मंत्रालयातील कार्यालयात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आदरांजली वाहिली. तो व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. ‘अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. ‘आज तुम्ही नाहीत परंतु तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. अप्पा, तुम्हाला कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन,’ असे ही त्यांनी पुढे म्हटले आहे.
मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने पुणे भाजपने एक कार्यक्रम आयोजित केला होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील त्यात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. ‘न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणे हे गोपीनाथरावांचे वैशिष्ट्य होते. जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नावर आंदोलने केली. त्यातून संघर्ष यात्रा, कर्जमुक्ती यात्रा, कापूस दिंडी अशा वेगवेगळ्या आंदोलनांतून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला होता. कार्यालयातील भारतीय जनता पक्ष त्यांनी रस्त्यावर आणला. तिथून भाजप हा रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा पक्ष झाला,’ अशा शब्दांत पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Special openings for…
केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…