महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ भागात भीषण जलसंकट, दुषित पाणी देतयं आजारांना आमंत्रण

मे महिन्यात सर्वत्रच पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. दरम्यान राज्यातील नाशिकमध्ये एका गावात पाणीसंकट निर्माण झाले आहे. हत्तीपाडा गावात सध्या सुरू असलेल्या जलसंकटामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एका स्थानिक महिलेने सांगितले की, आमच्या गावातील विहिरीत खूप घाण पाणी आहे. तसेच पाणी खूप खाली गेले आहे. महिलांना पाणी मिळण्यात खूप अडचणी येत आहेत. हे घाण पाणी पिऊन मुलेही आजारी पडत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात जलसंकट आले आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यात अनेक गावातील लोक जीव धोक्यात घालून विहिरींचे पाणी काढत आहे. या भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी गावकरी पाण्यासाठी ७० फूट विहिरीत उतरत आहेत. तर काही भागात कमालीची तापमानाची स्थिती आणि भूजलाचा सतत होणारा ऱ्हास यामुळे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

नाशकात गंगोडबारी येथील लोक पाण्यासाठी रोज जीव धोक्यात घालतात. ग्रामस्थांनी सांगितले की, गावात पाणीटंचाई जाणवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या १० वर्षांपासून ही समस्या उद्भवली आहे. नाशिकच्या गंगोडबारी गावातील लोक पाण्यासाठी ७० फूट विहिरीत उतरतात. तर दुसरीकडे आजूबाजूच्या इतर गावातील महिला विहिरीतून पाणी आणण्यासाठी २ किमी पायपीट करत आहेत. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांना पाण्यासाठी डोंगराखालील ठिकाणी जावे लागत असल्याचे स्थानिक लोकांचे सांगितले आहे.

रसिका येरम

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

6 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

6 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

7 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

10 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

11 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

11 hours ago