महाराष्ट्र

पार्थ पवारांची वडिलांच्या बजेटवर प्रतिक्रिया, म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी सोमवारी २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारचे हा दुसरा अर्थसंकल्प आहे. १० हजार २२६ कोटी महसुली तुटीचा, तर ६६ हजार ६४१ कोटी रुपयांचा राजकोषीय तुटीचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर राज्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना आता अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनीही अर्थसंकल्पावर एक ट्वीट केले आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे राज्याच्या ढासळलेल्या आर्थिक गाड्याचे चित्र या अर्थसंकल्पात उमटले आहे. तरीही कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी, महिला सबलीकरण या प्रमुख गोष्टीवर भर देण्यात आला आहे. हाच धागा पकडत पार्थ पवार यांनी अर्थसंकल्पावर एक ट्वीट केले आहे. राज्याच्या बजेटवर कोरोना महामारीचा परिणाम झाला असतानाही अर्थसंकल्पात विकासाच्या सर्वच गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. या अर्थसंकल्पाचा सर्वसामान्य जनतेला लाभ होईल, असे पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

आरोग्यासाठी १५ हजार कोटींच्या तरतुदी

‘कोव्हिड’च्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातच अर्थमंत्री पवार यांनी आरोग्य क्षेत्रातील योजना व त्यासाठीची आर्थिक तरतूद यांनी केली. राज्यातील आरोग्य संस्थांचे बांधकाम, श्रेणीवर्धनासाठी ७,५०० कोटी रुपयांचा प्रकल्प चार वर्षांमध्ये पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. महापालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींमध्ये दर्जेदार सेवांसाठी पाच वर्षांत पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, यंदा ८०० कोटी यासाठी देण्यात येणार आहेत. कर्करोग निदानासाठी १५० रुग्णालयांमध्ये सुविधा, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड, सातारा येथे नवी सरकारी मेडिकल कॉलेजे, ११ सरकारी परिचारिका विद्यालयांचे कॉलेजांमध्ये रुपांतर, जिल्हा रुग्णालयांमध्ये करोनोत्तर समुपदेशनासोबत आरोग्य आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली संचालक, नागरी आरोग्य या कार्यालयाची निर्मिती असे महत्त्वाचे निर्णय अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. सार्वजनिक आरोग्य खाते व वैद्यकीय शिक्षण विभाग मिळून जवळपास १५ हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

Rasika Jadhav

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

11 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

13 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

14 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

15 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

15 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

16 hours ago