महाराष्ट्र

जूनच्या अखेरीस मुंबईत पावसाची हजेरी

टीम लय भारी

मुंबई : जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करणारे मुंबईकर आता गारवा अनुभवत आहेत. यंदा हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत असलेले सर्व अंदाज चुकत आहेत. महाराष्ट्रात १५ जून रोजी पावसाचे आगमन होईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होते. परंतु हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या तारखेला पावसाने हजेरी न लावल्याने लोकांसोबतच शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला.

मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच मुंबईच्या अंधेरी, दादर, प्रभादेवी आणि वरळी, तसेच मुंबईच्या इतर उपनगरांत पावसाला सुरुवात झाली. सकाळीच पावसाची रिपरिप सुरु झाल्याने कामाला निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली. पण उन्हाच्या चटक्यांपासून सुटका झाल्याने मुंबईकरांनी या पावसाचा आनंद घेतला.

विदर्भातही पावसाचे आगमन
मुंबईसोबतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात सकाळापासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून डॅडी मारलेल्या पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा :

देशाच्या हवामानात मोठा बिघाड

भुस्खलनात 60 हून अधिक जवानांचा मृत्यू

ट्विटरवर समस्या मांडली, अन् ती उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतली

पूनम खडताळे

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

9 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

10 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

11 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

14 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

15 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

17 hours ago