महाराष्ट्र

डिस्चार्ज मिळताच राज्यपाल कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये

टीम लय भारी

मुंबई : राज्यामध्ये गेल्या पाच दिवसांपासून ‘सत्ता’नाट्य सुरु आहे. विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केली. त्याचदिवशी म्हणजे २२ जूनला राज्यपाल हे कोरोनाग्रस्त असल्याची माहिती समोर आली. पण आज रविवारी राज्यपाल कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल राजभवनाकडे रवाना झाले.

राजभवनात दाखल झाल्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विटरवर ट्विट पोस्ट केले आहे. यात त्यांनी म्हंटले आहे की, ‘आज चार दिवसानंतर रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता मी पूर्णपणे स्वस्थ आहे, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक दोन दिवस विश्रांती घ्यावी लागेल. सर्व शुभचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानतो.’

डिस्चार्ज मिळाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. राज्यपालांना दोन दिवसांची विश्रांती सांगण्यात आलेली असली तरी, त्यांनी राज्यातील बंडखोर आमदारांसाठीचे पत्र महाराष्ट्राच्या डीजीपींना पाठवले आहे. बंडखोर आमदारांच्या घरावर आणि कार्यालयावर शिवसैनिकांकडून हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा देण्यात यावी, यासंदर्भाचे पत्र राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई पोलीस कमिशनर आणि महाराष्ट्र डिजिपी यांना पाठविले आहे.

राज्याच्या सत्तांतरणामध्ये राज्यपालांची भूमिका ही महत्वपूर्ण असते. परंतु राज्यात सत्तानाट्य सुरु झाल्यानंतर कोश्यारी हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झाले. पण आता त्यांना डिस्चार्ज मिळाल्याने सर्वांचे लक्ष राज्यपालांच्या भूमिकेकडे लागून राहिले आहे. दरम्यान, केंद्राकडून बंडखोरी केलेल्या १५ आमदारांना सीआरपीआफ सुरक्षा पुरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात सुरु असलेल्या राजकारणाच्या गदारोळामध्ये भाजप आणि केंद्राची महत्वाची महत्वाची भूमिका असल्याचे असल्याचे बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा :

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना डिवचले; मांजराच्या अवतारातील वाघाचा फोटो टाकून उडविली खिल्ली

बंडखोर आमदारांचा खर्च कोण करतेय, अनिल गोटेंनी केली ईडीकडे तक्रार !

VIDEO : एकनाथ शिंदे आमदारांना घेवून गुवाहाटीलाच का गेले, माजी खासदार आनंद परांजपेंनी सांगितले अचंबित करणारे कारण !

पूनम खडताळे

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

13 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

14 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

15 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

16 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

16 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

17 hours ago