मंत्रालय

शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? त्याने रक्ताच्या थेंबाने लिहिले राज्यपालांना पत्र..!

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वगुणसंपन्न आहेत तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? असा आर्त सवाल बीड जिल्ह्याच्या दहिफळ बदमाऊली गावातील एका शेतकरी पुत्राने राज्यपाल रमेश बैस यांना चक्क रक्ताच्या थेंबाने पत्र लिहून विचारला आहे. ह्रदयाला पाझर फोडणाऱ्या या पत्रामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून राज्यपालांकडून या पत्रावर काय प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

श्रीकांत विष्णू गदळे असे या शेतकरी पुत्राचे नाव आहे. लोकशाही जगात शेतकऱ्यांच्या पत्राला किंमत नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा लिहून पेनाची शाई संपली. त्यामुळे मी आता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्याने पत्रात म्हटले आहे. माझ्या रक्ताला लोकशाही जगात किंमत आहे का? असा आर्त सवाल करून राज्यपाल महोदय आपण सांगा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वगुणसंपन्न आहेत तर शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? अशी विचारणा श्रीकांत गदळे यांनी राज्यपालांना केली आहे.

हे सुध्दा वाचा :

राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी मनोज सौनिक, डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत

बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा ; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक

राज्याच्या तिजोरीत खडखडाट; धनादेशांचे वितरण रोखले!

शेतकऱ्यांना अनुदानाची भीक नको, शेतीमालाला योग्य भाव द्या, अशी कळकळीची मागणी त्यांनी या पत्रातून केलेली आहे. जुने राज्यपाल बदलले, नवीन राज्यपाल आले, पण जुने प्रश्न नवीन राज्यपालांना सोडवता येणार का? असा सवालही गदळे यांनी पत्रात केला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मला आमदार करा, मी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करतो, खऱ्या अर्थाने कृषी प्रधान देश बनवतो, असेही गदळे यांनी पत्रात नमूद केले आहे. बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गदळे यांनी हे पत्र राज्यपालांपर्यंत पोहचविले आहे. पत्राच्या शेवटी त्यांनी ‘जय किसान’ असा नारा दिलेला आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

14 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

14 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

15 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

16 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

17 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

18 hours ago